सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

ईतिहास परिषद !!!!


शरद पवारांनी ईतिहास परिषद घेतली, त्याच्यानंतर सगळीकडे गदारोळ ऊठलाय.
आज या परिषदेची गरज काय ?
एक वाक्य आपन नेहमी अभिमानाने मिरवून ऐकत असतो. 'दूसर्या राज्यांना फक्त भूगोल आहे पण महाराष्ट्राला ईतिहास आहे.' हे खरेही आहे. ईतिहास आहे, संस्कृती आहे, जून्यापूराण्या वास्तू आहेत. हे निश्चितच अभिमानास्पद आहे. 
दूर्दैव इतकेच की त्या महापूरषांना जातीधर्मात विभागलं गेलं. हे कधी झालं ? याचा उगमस्त्रोत कुठ आहे हे पाहील पाहीजे.
आज सेक्युलर नाॅनसेक्युलर इ विभागवारी आपल्यात आहे. हे कशामुळं झालं ? इत्यादी प्रश्नांचा उहापोह होणे गरजेचे वाटत आहे.
आपल्या भोवताल ईतिहास हे फक्त ऐकून वाचून किंवा मालिका, सिनेमा ईत्यादीतून हे समाजापर्यंत पोहचतंय. आता लिहणारा, सांगणारा तो त्याला ज्या पद्धतीने आकलन झालेलं आहे अधिक त्याची मतं तो लादत नसेल कशावरून ?
तर हे थोड्याफार फरकाने झालेही असेल. शक्यता नाकारता येत नाही. यातून जर जातीधर्मात रोज तंटे लागत असतील, तर कितीही विकासाच्या गप्पा केल्या तरीही समाजाची स्थिती सुधारत नाही. सामाजिक एकोप्यातूनंच प्रत्येक कार्य पुर्णत्वास जाते. इथे तर बरीच कामे एकमेकावर अवलंबून आहेत. त्याप्रसंगी एकदा सत्य समोर येवून एकदाची पक्की मांडणी झाली की त्याला प्रमाण मानून जर शांतता प्रस्थापित होणार असेल तर कुणाचा विरोध का व्हावा ?
आता शरद पवार हे काही ईतिहास तज्ञ नाहीत. विरोधी पक्षनेते आहेत. नवे सरकार आल्यापासून जाणिवपुर्वक त्या सरकारातील लोकांनी जनतेसमोर आपन काय ठेवतोय याचंही एकदा विचार झाला पाहीजे.
गोहत्याबंदी, पाचपंचवीस मुलं जन्माला घालायचा सल्ला, पंकजाताई अभ्यासक्रमात काय समाविष्ट करू पाहत आहेत ?, अखलाक ते रोहित वेमुला, पठाणकोट हल्ला, अभाविपची कारनामे ई. गोष्टी कोणत्या वेगाने येवून आदळत आहेत ? याचे परिणाम काय होणार आहेत ?
याची उत्तरं भयानक आहेत. दोन जातीधर्मात जर वाद लागले तर त्याचा शेवट काय होतो ? कित्येक सामान्यजनांचाच यात बळी जातो. आणि रोष कायमचाच राहतो. तो निराळा.
याप्रसंगी विकासाच्या चकचकीत गप्पा मारत असताना देशात जर रक्ताचे सडे पडत असतील तर तो विकास घेवून काय मेलेल्यांचे पुतळे बनवायचे आहे काय ?
जग आज जवळ आलंय. भारताची अर्थव्यवस्था मोठ्ठी आहे, ते असूनही कधी कशाला धक्का नाही. लोकसंख्येच्या मानाने तितक्याच जातीधर्मजमाती इथं आहेत. रोज ऊठून जर देशांतर्गतच भांडण होणार असतील तर पाकिस्तानातून येणारे दहशतवादी काय घरजावई आहेत ? सर्वात पहिल्यांदा देशी दहशतवादाचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. त्याचा संबंध ईतिहासाशी कुठेतरी अस्मिता भावने यातून जूळलाय. एकदा ही बैठक पक्की झाली की बरेच वाद मिटतील.
पवार ईतिहास लिहत नाहीत. ईतिहासात जे तज्ञ लोक आहेत त्यांना घेवून ते परिषद घेत आहेत. मतमतांतरे असू शकतात. ती खोडूनही काढावीत. त्यात जर एखादं संशोधन पुढं येत असेल तर त्याचा समावेश व्हावा. चांगलं घ्याव वाईट टाकावं. ऊगाचच काहीही न करता किंवा माहित असता का वाद घालायचा ?
असं होणं गरजेचं आहे.