बुधवार, ९ मार्च, २०१६

ती फक्त अस्तित्वासाठी भूंकतात.

अरे तुमची पोरं कधी मोबाईलातून डोकी वर काढतात का ? 
कधी एखाद्या माणसाच्या मदतीला ते पडलेत काय ?
कँडीक्रश सोडून गुगल कडे कधी गेलीत का ? गुगल ठीक पुस्तकं तर पाहिल्यात का ? 
कुठल्यातर व्यावसायिक अनाथश्रमाला लाख दोन लाख रूपये दिले म्हणजे समाजसेवा केल्याचा भंपक भास करून घेणार्याला किती अक्कल असते याचे एकदा मोजमाप घेतलं पाहीजे. 
मान्य आहे आमचे आईबाप अडाणी आहेत.गरीब आहेत, भोळे आहेत शिकत असताना आम्ही आइबापालाही थोडंफार शिकवत असतो. इथंच आमचा पहिला संघर्ष असतो. अडाणीपण, अंधश्रद्धा संपवत असतो आम्ही. अडाणीपणात कट्टरपणा जादा असतो. तो आम्ही मायेनेच संपवितो.
हे कळायला भोगायला लागतं सगळं. ते येत नाही सहसासहजी लक्षात.
आमचं घर कसंही असो या देशाचा नागरिक आहे, संविधानानं आम्हाला ताकद बहाल केलीये. समानता दिलीय. ती जागत जागवत असतो.
गावातली गार केलीत भलीभली आम्ही माॅर्निंग वाॅक आणि जीम करणार्या फोकशाना आम्ही पूरून ऊरू.
कन्हैया असल्या बोंबलभिक्याना कुणी विचारत नसतं ती फक्त अस्तित्वासाठी भूंकतात.
wink emoticon

एक सांगु ?

एक सांगु ? 
नव्वद ब्यानव नंतर अर्थव्यवस्था बदलली. 
रोजगाराच्या आणि कामाच्या संधी प्रत्येकाला मिळाल्या. कुणी कुणावर अवलंबून राह्यलं नाही. त्यात उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी हे जसंच्या तसं धनदांडग्यानी आत्मसात केलतं ते तसंच बसले. त्यांची पोरं फार शिकली नहीत. 
ज्यावेळी एखाद्याला शेतमजूरीशिवाय पर्याय नव्हताच त्यावेळी तो शेतमालकाला आण्णा, सावकर, राजे, धाकलं मालक, थोरलं मालक, शेठजी असं म्हणटला तर त्या व्यक्तीला भारी वाटायचं. 
पुढची पिढी धनदांडग्यांची बिनशिकता बोंबलत बसली आणि रोजगार्यांची मुलं शिकून गावं सोडून गेली. त्यावेळी त्यांच्या घरात सुद्धा शिक्षण आलं आणि शहाणं झाली घरची लोकं ती आत्ता या लोकांना पुर्वीच्या पदव्या देत नहीतंच. पण यांच्या न शिकलेल्या पोरांची ती अपेक्षा असते की आम्हाला सावकर वगैरे म्हणावं !
ती दिवसं गेली आत्ता. तुम्ही गुंठ्यानं जमनी विकून घेतलेल्या बुलट, स्कारपिओ वर तेवढं लिवू शकता. 



grin emoticon

शिक्षण हे सगळ्या प्रश्नावरंच उत्तर नाहीच.

शिक्षण हे सगळ्या प्रश्नावरंच उत्तर नाहीच. शाळा काॅलेजात जावून नेमून दिलेली पुस्तक वाचून मार्क पाडणे ह्याला जर शिक्षण म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. आजूबाजूला बरंच शिक्षण पडलंय. एक मित्र सातवीत शाळा सोडला धंद्यात पडला आजरोजी चारपाच कोटीचा मालक आहे. हे आर्थिकदृष्ट्या झालं. पण सामाजिकदृष्ट्या जरबघितल तर हिकडं तिकडं आजूबाजूला बरेच लोक शिकवणारे असतात. प्रत्येकाकडं कायनाकाय असतंय. ते बघून शिकता आलं पाहिजे. पास होत असताना एक चांगली सामाजिक, व्यावहारिक जाणिव होणं गरजेच आहे. खरं आपल्यात शिक्षण हे पोटासाठी आपल्या गरजा भागविण्यासाठी घेतलं जातंय. त्यात उत्सफुर्तपणा नाही. दबाव आहे, दबावातंन कायच चांगल घडू शकत नाही. मग नैराश्य येवून आत्महत्या होतात. यात आत्महत्या करणारे बरेच लोक युनव्हरसिटीतंन बाहेर पडून बाहेरच्या जगाबरोबर थेट संबंध आला की गडबडतात. तिथं फक्त शिक्षण फसतं. व्यावहारिक आणि सामाजिकस्थिती लक्षात यायला लोकांत मिसळाव लागतं. शिक्षणपद्धतीने हे बंद केलंय. अनेक माध्यमातले लोक सुद्धा मार खावून परतले आहेत.
शिक्षण गरजेचं आहे, पण त्याचबरोबर स्वतःचं असं कायतर पायजेल असल तर हिंडाव लागेल.
यातून विचार जाणून घ्यायला मदत हूईल. राजकारणात संवेदनशीलपणा आणि सुसंस्कृतपणा येईल. राजकारण हे पाहीजेच. मला तर वाटतंय पाचवीपासून राज्यशास्त्र हा विषय ठेवावा.