बुधवार, ९ मार्च, २०१६

एक सांगु ?

एक सांगु ? 
नव्वद ब्यानव नंतर अर्थव्यवस्था बदलली. 
रोजगाराच्या आणि कामाच्या संधी प्रत्येकाला मिळाल्या. कुणी कुणावर अवलंबून राह्यलं नाही. त्यात उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी हे जसंच्या तसं धनदांडग्यानी आत्मसात केलतं ते तसंच बसले. त्यांची पोरं फार शिकली नहीत. 
ज्यावेळी एखाद्याला शेतमजूरीशिवाय पर्याय नव्हताच त्यावेळी तो शेतमालकाला आण्णा, सावकर, राजे, धाकलं मालक, थोरलं मालक, शेठजी असं म्हणटला तर त्या व्यक्तीला भारी वाटायचं. 
पुढची पिढी धनदांडग्यांची बिनशिकता बोंबलत बसली आणि रोजगार्यांची मुलं शिकून गावं सोडून गेली. त्यावेळी त्यांच्या घरात सुद्धा शिक्षण आलं आणि शहाणं झाली घरची लोकं ती आत्ता या लोकांना पुर्वीच्या पदव्या देत नहीतंच. पण यांच्या न शिकलेल्या पोरांची ती अपेक्षा असते की आम्हाला सावकर वगैरे म्हणावं !
ती दिवसं गेली आत्ता. तुम्ही गुंठ्यानं जमनी विकून घेतलेल्या बुलट, स्कारपिओ वर तेवढं लिवू शकता. 



grin emoticon

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा