सोमवार, १८ जानेवारी, २०१६

इथ ज्या ज्या वेळेला काही घडत असतं, त्यावेळी सगळंच शंकास्पद वाटतंय. गरीब असतो तो तळमळून मरतो पण त्याला न्यायच मिळत नाही. कितीतरी खून होतात, बलात्कार होतात, हत्याकांड होतात, दंगली होतात नंतर नंतर ते सगळं पुसट होतं जातं. आपनही (जनता) सगळ विसरून जातो आणि ब्रेकिंग न्युज वर जोक, आलेले इमोशनल मेसेज फाॅरवर्ड करून दाखवण्यासाठी दुःखी अथवा सुखी होतो. पण त्यातलं शेवटपर्यंत कधीच काहीच राहत नाही आणि त्यावर कुणाला विचार करावा वाटत नाही हे एक दूर्दैव. 
ज्या ठिकाणी समान संधीच्या गोष्टी होतात किंवा असतात, तिथंच त्या समानाचा गळा घोटला जातो. आणि चिमुटभर बलाढ्य लोकांच्याच हातंची बाहुली ही व्यवस्था होते. त्यावेळी समान संधी/हक्क मिळायची व्यवस्था मरते. मग सर्वत्र न्युट्र्यालिटी येते. मोठ्ठा अधिक मोठ्ठाच होतो लहान अथवा गरीब हा अधिकच गरीब होवून कधीतर नष्ट होतो.
चिवट झुंज देतो तो मध्यमवर्गीय होतो. आत्ताच्या या व्यवस्थेतल्या चाणक्यांना मध्यमवर्गीय हे अतिप्रिय. हेच मध्यमवर्गीय मिटक्या मारत जोक फाॅरवर्ड करत बसतात. अर्थात ती त्यांची चुक नाहीच. त्यांचा तो विरंगुळा आहे. कधीकधी लहान मोठे उद्रेक होतात त्यावेळी रस्त्यावर कोण असतात ?
त्यांना रस्त्यावर नेणेही आणि समर्थनार्थ अथवा विरोधात घोषना द्यायला लावणारे असतात हे यांना कळत नाही. ह्यांना आपलेच अप्रिम कौतुक. हे बनावट असतं हे सांगणार तरी कोण ?
वापरून झाल्यावर बांधून ठेवणे. पाहिजे त्यावेळी गर्दीला रस्त्यावर नेणे आणि पाहिजे त्यावेळेस तिला कोंडून ठेवणे हे आत्ता होतंय. हे वाईट आहे. समर्थनार्थ गर्दी उतरवून व्यवस्थेत उतरल्यानंतर त्या गर्दीची ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी ती आक्रमक न होता केलेल्या समर्थनाची लाज वाटून ती शरमिंदी होते. त्यावेळी एकाधिकारशाही अथवा हुकूमशाहीची सूरवात असते. हे जाणवायला वेळ लागतो आणै आपन वर्षानुवर्षे अधिकच अआंधळे होतो.
सन्मानाने पोट भरत नसते.
समान संधी दिसायला असतात किंवा मानायला असतात. कर्तृत्वान असतो तो पुढे येतो हे जगजाहिर असतं. तो पुढे येतो त्याचा स्तर ऊंचावतो हे मान्य. पण तो कुणाच्या छत्रछायेखाली पहुडतो ? कुणाचा गुलाम होतो हे त्यालाही ठावूक नसतं.
अशा परिस्थितीत मोटिव्हेशनल आणि इंटरप्रेनिंगचं प्लॅस्टीक युग चालू होतं. मग सलमान सूटला की जल्लोषाचे निर्लज्ज तमाशे सूरू होतात.

10 december 2015
काही वर्षांपुर्वी एक नेता, राजा या जगी होवून गेला. तो एकाच वेळी राजा आणि बुद्धीवंत होता, लोकांना खेचायचा नेहमी आपल्याकडे. तर तो बराच आत्मविशास असलेला होता त्याच भरात तो बोलून गेला 'अशक्य' हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. 
असा तो आत्मविश्वास. 
त्याने सांगितलेलं आणि आजही तंतोतंत लागू पडत असलेलं एक विधान ' A man will fight harder for his interests than for his rights.' (माणूस आपल्या हक्कापेक्षा फायद्यासाठी जास्त लढतो).
............................................................
आजच्या या वातावरणात मला याची हटकून आठवन होतेच होते. गर्दी खेचणार्या जंगी सभा होतात, एखादे विरोधक सत्ताधारी होतात आणि सांगितलेल्या विकासाच्या मुद्दयावरून ते थेट धर्माच्या वातावरणात घसरतात, आणि परिस्थिती हाताबाहेर जावून भयंकर घटना घडू लागतात. आणि 'असहिष्णु' परिस्थिती होते. त्यावेळेस सरकार त्याला जबाबदार असते. ही साधी सरळ बाब.
............................................................
लोकसभा निवडणुकीत जो पक्ष निवडूण आला, आणला ते कुणी आणलं ?
स्वतः एकाच्या जिवावर नरेंद्र मोदींनी.
आज 'असहिष्णू' वातावरणात पूरस्कार वापस करणारे कितीजण ?
तर ते पन्नासेक थोडे अधिक किंवा कमी. बुद्धिमंत हे चांगलेच त्यांनी पुरस्कार परत केलं हेही ठिक. पण जर आजरोजी जनमताचा कौल घेतला तर बुद्धीमंत लोकांच्या पाठी उभे राहण्यापेक्षा मोदींच्या पाठीशी जास्त लोक निर्विवादपणे राहतील यात मला या क्षणी कोणतीच शंका नाही. कारण ही तसंच, पुरस्कार परत करणारे एकतर लेखक किंवा कलाकार त्यात या करोडोंच्या संख्येने लोक राहणार्या देशात यांच्या कलाकृती अथवा साहित्यकृती विचार कितपत लोकांपर्यंत पोहचल्या हे बघणे गरजेचे आहे असे वाटते.
अनेक लोकांना पुरस्कार परत केल्यानंतर एखाद्या लेखकाचे अथवा कलाकारचे नाव माहित झाले. हे सत्य आहे याकडे कानाडोळा करून चालायचे नाही.
................................................................
हे असे का ?
शहाणा माणूस एखाद्या मुर्खाला भेटायला जितका नाराज असतो त्याच्याच शंभरपटीने मुर्ख माणूस शहाण्याला भेटायला नाराज असतो.
त्यात आमचे जे बुद्धिमंत लोक आहेत हे स्वतःच्या कोशातंच रमणारे. ते त्यांचा समूह, दर्जेदारपणाच्या चर्चा इत्यादीतून बाहेर पडत नाहीत ते आपल्याच कोशात रममाण, तल्लीन, गर्क असतात.
त्यात त्यांचा असाही विचार असु शकेल की ' मुर्खांशी किती हुज्जत घालायची ?' .
जे असेल ते असो. पण हे लोक सामान्यांपर्यंत पोहचावयास कमी पडले हे तर ध्यानी घ्यावं.
.............................................................
सामान्य लोक कुठे गेले ? कसे फसले ? त्यांना मुर्ख कुणी बनविलं ?
काळाचा झपाटा असा काही वेगवान असतो की तो भलभल्यांनाही चिरडून टाकतो. मग वेळ गेल्यावर हाती काहीच शिल्लक राहत नाही.
तर सामान्य लोकांची गर्दी ही एखाद्या नवसाला पावणार्या देव देवीच्या मंदीरात दिसेल,
सामान्यांची गर्दी एखाद्या धर्मवादी नेत्याच्या सभेत दिसेल.
सामान्यांची गर्दी ही एखाद्या आसाराम सारख्या संताच्या सत्संगात दिसेल.
सामान्य माणूस कधीच न येणार्या एखाद्या कायद्यासाठीच्या आंदोलनात दिसेल.
यावरून तर सामान्य लोक आपला पत्ता चुकलेत हे ध्यानी आलं असेलंच.
...............................................................
सामान्य लोक तिथे का गेले ?
परत मी नेपोलियनला आणतोय.
'लोक आपल्या हक्कापेक्षा आपल्या फायद्यासाठी जास्त लढतात.'
वर्षाणुवर्षे चालत आलेल्या धर्मपरंपरांचा दांभिक अभिमान असतो, जर कुणी आपल्या धर्मातल्या चुका दर्शवायचे काम करत असेल तर त्यास आपला विरोध असतो, त्याच्याप्रति राग असतो, त्याला अस्मिता हे कारण, ते प्रत्येकाच्या मनामनात दडलेलं असतं. जो एखादा समूहा पुढे असा व्यक्त होतो त्याला ही गर्दी डोक्यावर घेते.
आजचे संत ज्यांचं काही जपल्यानं, भजल्यानं लाभ होत असतो, नजर लागत नसते, सूरक्षा कवच येते त्या सत्संगास लोक गर्दी करतात आणि वरतून खिसाही रिकामा करतात, श्रद्धा हा भाग सोडल्यास ढोंगीपणास आमचा विरोध आहे.
तर हे अशापद्धतीचे 'फायदे' लोकांसमोर आहेत तिथे सामान्यजन गर्दी करतो.
.....................................................
आता हक्क...
अंनिस ही संस्था तात्विक तिथे गर्दी नाही.
आम्हास आजही काही ठिकाणी प्यावयास शुद्ध पाणी नाही तिवरच्या आंदोलनात गर्दी नाही.
अलिकडे महिलांची एक संस्था 'राईट टु पी' म्हणून एक आंदोलन चालवते त्यात त्या महिलांसाठी शौचालयाची मागणी करताहेत. तिथे गर्दी नाही.
ही आजच्या तारखेची कथा.
..............................................................
लोकमान्य टिळक लिहायचे त्यांचे अग्रलेख लोक वाचायचे आणि चळवळीची दिशा ठरायची. आज तसे होते का ? मुदलात अग्रलेख कोण वाचतो ? हा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांचे वाचायचे यामागची कारणं लक्षात घेतली तर ते लगेच लक्षात येईल ते लोकांपर्यंत पोहचले होते. बरीच जूने लोक आहेत. (येथे त्यांचे विचार वगैरे प्रश्न थोडे दुर्लक्षा)
...............................................................
शेवट :
आजचे काय ?
जोपर्यंत आपला कोश, विश्व सोडून हे बुद्धीमंत लोक सामान्यांपर्यंत पोहचत नाहीत तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होणे महाकठीण. दोन पर्यांयावर देश चालत आहे. तिथे आणखी पर्याय उभारणे हे कठीण असले तरी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळेच झालीतर कुठे सुधारणा होईल.
नाहीतर इंग्लीश दारू आवडते पण मुलामुलीनं परजातीत केलेलं लग्न आवडणार नाही असाच आपला 'विकास' होईल. आणि यास बुद्धिमंतच जबाबदार असतील.
आज पवारसाहेब आलते शिरोळला सारे आजोबांच्या पुर्णाकृती पूतळ्याच्या अनावरनाला. 
पवारसाहेब जिल्ह्यात, सांगलीत कुठंबी येणार असले की मला वैयक्तीक आनंद होतो. गाडी घेतो आणि सुटाळतो. 
आज साडेतीनंच टायमिंग होतं. पवारसाहेब टायमात हजर होवून पुतळा अनावरन करून स्टेजवर गेले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा, पतंगराव कदम, सारे आजोबांचे जवळचे मित्र थोरात आणि डझनभर नेतेमंडळी होती. 
प्रास्ताविक आवाडेदादांनी केलं. जे रटाळ असतं. त्याच्यानंतर थोरातांनी भाषन केलं. त्यांचा आवाज आणि तोंडावरचे एक्सप्रेशन बघण्याजोगे असतात.
मग पतंगराव कदमांचं भाषनसाठी नाव पुकारलं, पतंगराव लै मज्जा करतात. ऊठतानाच इजार वढत वढत ऊठले, परत माईक समोर येवून ऊभं राहिल्यावर एकदा वढले. मग एकेकाची पद्दशीर इज्जत काढत काढत उल्लेख केले. आमच्या आमदार उल्हास पाटलांची तर एवढी चेष्टा केली काय विचारू नका. नंतर म्हणटले.
दत्त कारखान्याचे संस्थापक दत्ताजीराव कदमांचा पूतळा सारे पाटलानी बसवला.
दिनकरराव यादवांचा पूतळा बसवला.
आत्ता आपन सगळ्यानी मिळून सारे पाटलांच पूतळा बसवलं.
कर्तृत्वान माणसाची पूतळं बसवतात.
मधेच त्यांना चंद्रकांत दादा दिसले. हे एकदा जे पट्टा चालु केला कदमांनी ते शेवटपर्यंत चंद्रकांतदादाना धूतंल.
म्हणटले. तुम्ही संघात असता. हाफ विजार काठ्या घिवून जाता. तिथं शिस्त शिकवत्यात. कडक शिस्त. तुमी बी लै कडक शिस्तवान रावं. मोदीस्नी सांगून तेवढं साखर कारखानदारीचं बघा की.
असं लै मजेदार भाषन केलं.
मग चंद्रकांत दादांच भाषन चालु झालं. चंद्रकांतदादा हा माणूस अगदी चतुर आहे. आपल्यावर आलेलं पद्धतशीरपणे पवारसाहेबांवर ढकलंल. म्हणटले मोदी माझ्यापेक्षा पवारसाहेबांच जादा ऐकतात. त्यांनाच सांगायला लावलं पाहीजे. चंद्रकांतदादांचे उच्चारसुद्धा स्प्षट असतात. तितकंच भाषनही मुद्देसुद.
त्यानंतर साहेबांचं भाषन.
साहेब म्हणटले,
पतंगराव कदम माणूस चांगलं आहेत. ते बोलायला लागलं की मला बी भ्या वाटत्या. आज भारती विद्यापीठाचं सर्वत्र नावं आहे. पतंगरावकडून नियोजन शिकलं पाहीजे.
नंतर चंद्रकांतदादांची तारिफ केली. आणि जी ठिणगी पडलीती ती विझवली. आज जगाच्या बाजारपेठेत साखरेची कंडीशन काय आहे. यावर त्यांनी थोडा वेळ बोलले. जपान मध्ये एका संशोधकांच्या टीमने एक नवीन ऊसाची प्रजात तयार केलीय. त्यात ऊसाला चाळीस दिवसातून एकदा पाणी दिलं की ते चालतंय. म्हणजे पाण्याची गरज अगदीच कमी. सरासरी 65टन उतारा प्रतिएकरी पडतो. आत्ता आपल्याकडे 34 उतारा आहे. आणि त्याचा साखर उताराही 12 आहे. त्या संशोधकांबरोबर काल साहेबांची चर्चा झाल्या. ते हिकडं आणायचं नियोजन चालु असल्याचं साहेबांनी सांगितलं.
साहेबांकडून घेण्याजोगं लै कायकाय आहे, इथंच बघा की दोन मिनटात पतंगरावांची भांडणं मिटवली. नवीन तंत्रज्ञानाविषयी सजगता दाखवली. एक खरं सांगतो, पवारसायबांच इमप्रेशन नादखुळाच पडतंय.
..
सा.रे पाटील आमच्या पलिकडच्या जांभळी गावातले. ते समाजवादी होते. विवीध क्षेत्रातली लोकं ओळखीची. नरेंद्र दाभोलकरांच्या चळवळीत होते. आणि बरंच काहीकाही.
ह्या लोकांकडंन बघून शिकलं पाहीजे असं वाटतंय. आज जे नुस्तेच साहेबांचे अनुयायी म्हणून मिरवणारे पांढर्या शर्टवाल्यांनी थोडफार इकडंतिकडंही पाहीलं तरी बरं होईल.