सोमवार, १८ जानेवारी, २०१६

काही वर्षांपुर्वी एक नेता, राजा या जगी होवून गेला. तो एकाच वेळी राजा आणि बुद्धीवंत होता, लोकांना खेचायचा नेहमी आपल्याकडे. तर तो बराच आत्मविशास असलेला होता त्याच भरात तो बोलून गेला 'अशक्य' हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. 
असा तो आत्मविश्वास. 
त्याने सांगितलेलं आणि आजही तंतोतंत लागू पडत असलेलं एक विधान ' A man will fight harder for his interests than for his rights.' (माणूस आपल्या हक्कापेक्षा फायद्यासाठी जास्त लढतो).
............................................................
आजच्या या वातावरणात मला याची हटकून आठवन होतेच होते. गर्दी खेचणार्या जंगी सभा होतात, एखादे विरोधक सत्ताधारी होतात आणि सांगितलेल्या विकासाच्या मुद्दयावरून ते थेट धर्माच्या वातावरणात घसरतात, आणि परिस्थिती हाताबाहेर जावून भयंकर घटना घडू लागतात. आणि 'असहिष्णु' परिस्थिती होते. त्यावेळेस सरकार त्याला जबाबदार असते. ही साधी सरळ बाब.
............................................................
लोकसभा निवडणुकीत जो पक्ष निवडूण आला, आणला ते कुणी आणलं ?
स्वतः एकाच्या जिवावर नरेंद्र मोदींनी.
आज 'असहिष्णू' वातावरणात पूरस्कार वापस करणारे कितीजण ?
तर ते पन्नासेक थोडे अधिक किंवा कमी. बुद्धिमंत हे चांगलेच त्यांनी पुरस्कार परत केलं हेही ठिक. पण जर आजरोजी जनमताचा कौल घेतला तर बुद्धीमंत लोकांच्या पाठी उभे राहण्यापेक्षा मोदींच्या पाठीशी जास्त लोक निर्विवादपणे राहतील यात मला या क्षणी कोणतीच शंका नाही. कारण ही तसंच, पुरस्कार परत करणारे एकतर लेखक किंवा कलाकार त्यात या करोडोंच्या संख्येने लोक राहणार्या देशात यांच्या कलाकृती अथवा साहित्यकृती विचार कितपत लोकांपर्यंत पोहचल्या हे बघणे गरजेचे आहे असे वाटते.
अनेक लोकांना पुरस्कार परत केल्यानंतर एखाद्या लेखकाचे अथवा कलाकारचे नाव माहित झाले. हे सत्य आहे याकडे कानाडोळा करून चालायचे नाही.
................................................................
हे असे का ?
शहाणा माणूस एखाद्या मुर्खाला भेटायला जितका नाराज असतो त्याच्याच शंभरपटीने मुर्ख माणूस शहाण्याला भेटायला नाराज असतो.
त्यात आमचे जे बुद्धिमंत लोक आहेत हे स्वतःच्या कोशातंच रमणारे. ते त्यांचा समूह, दर्जेदारपणाच्या चर्चा इत्यादीतून बाहेर पडत नाहीत ते आपल्याच कोशात रममाण, तल्लीन, गर्क असतात.
त्यात त्यांचा असाही विचार असु शकेल की ' मुर्खांशी किती हुज्जत घालायची ?' .
जे असेल ते असो. पण हे लोक सामान्यांपर्यंत पोहचावयास कमी पडले हे तर ध्यानी घ्यावं.
.............................................................
सामान्य लोक कुठे गेले ? कसे फसले ? त्यांना मुर्ख कुणी बनविलं ?
काळाचा झपाटा असा काही वेगवान असतो की तो भलभल्यांनाही चिरडून टाकतो. मग वेळ गेल्यावर हाती काहीच शिल्लक राहत नाही.
तर सामान्य लोकांची गर्दी ही एखाद्या नवसाला पावणार्या देव देवीच्या मंदीरात दिसेल,
सामान्यांची गर्दी एखाद्या धर्मवादी नेत्याच्या सभेत दिसेल.
सामान्यांची गर्दी ही एखाद्या आसाराम सारख्या संताच्या सत्संगात दिसेल.
सामान्य माणूस कधीच न येणार्या एखाद्या कायद्यासाठीच्या आंदोलनात दिसेल.
यावरून तर सामान्य लोक आपला पत्ता चुकलेत हे ध्यानी आलं असेलंच.
...............................................................
सामान्य लोक तिथे का गेले ?
परत मी नेपोलियनला आणतोय.
'लोक आपल्या हक्कापेक्षा आपल्या फायद्यासाठी जास्त लढतात.'
वर्षाणुवर्षे चालत आलेल्या धर्मपरंपरांचा दांभिक अभिमान असतो, जर कुणी आपल्या धर्मातल्या चुका दर्शवायचे काम करत असेल तर त्यास आपला विरोध असतो, त्याच्याप्रति राग असतो, त्याला अस्मिता हे कारण, ते प्रत्येकाच्या मनामनात दडलेलं असतं. जो एखादा समूहा पुढे असा व्यक्त होतो त्याला ही गर्दी डोक्यावर घेते.
आजचे संत ज्यांचं काही जपल्यानं, भजल्यानं लाभ होत असतो, नजर लागत नसते, सूरक्षा कवच येते त्या सत्संगास लोक गर्दी करतात आणि वरतून खिसाही रिकामा करतात, श्रद्धा हा भाग सोडल्यास ढोंगीपणास आमचा विरोध आहे.
तर हे अशापद्धतीचे 'फायदे' लोकांसमोर आहेत तिथे सामान्यजन गर्दी करतो.
.....................................................
आता हक्क...
अंनिस ही संस्था तात्विक तिथे गर्दी नाही.
आम्हास आजही काही ठिकाणी प्यावयास शुद्ध पाणी नाही तिवरच्या आंदोलनात गर्दी नाही.
अलिकडे महिलांची एक संस्था 'राईट टु पी' म्हणून एक आंदोलन चालवते त्यात त्या महिलांसाठी शौचालयाची मागणी करताहेत. तिथे गर्दी नाही.
ही आजच्या तारखेची कथा.
..............................................................
लोकमान्य टिळक लिहायचे त्यांचे अग्रलेख लोक वाचायचे आणि चळवळीची दिशा ठरायची. आज तसे होते का ? मुदलात अग्रलेख कोण वाचतो ? हा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांचे वाचायचे यामागची कारणं लक्षात घेतली तर ते लगेच लक्षात येईल ते लोकांपर्यंत पोहचले होते. बरीच जूने लोक आहेत. (येथे त्यांचे विचार वगैरे प्रश्न थोडे दुर्लक्षा)
...............................................................
शेवट :
आजचे काय ?
जोपर्यंत आपला कोश, विश्व सोडून हे बुद्धीमंत लोक सामान्यांपर्यंत पोहचत नाहीत तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होणे महाकठीण. दोन पर्यांयावर देश चालत आहे. तिथे आणखी पर्याय उभारणे हे कठीण असले तरी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळेच झालीतर कुठे सुधारणा होईल.
नाहीतर इंग्लीश दारू आवडते पण मुलामुलीनं परजातीत केलेलं लग्न आवडणार नाही असाच आपला 'विकास' होईल. आणि यास बुद्धिमंतच जबाबदार असतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा