शेतीला जोडधंदा म्हणून दूभती जनावरं पाळली जातात. आपल्याकडे गायी आणि म्हशी यांच्यापासून प्रामुख्यानं दूध मिळतं. शेळीमेंढी पासून मिळतं पण ते अल्प असतं. आजरोजी हा उद्योग अंदरबट्ट्याचा ठरताना दिसत आहे. त्यामूळे बराच मोठ्ठा शेतकरी वर्ग आपला गोठा रिकामा करत आहे. मध्यंतरी माननीय खासदार राजू शेट्टी यांनी दूधदरासाठी आंदोलन केलं. त्याचा फायदाही झाला. आजरोजी शेट्टींचाही दूध संघ आहे.
शेतकरी सोडून काही इतर लोक जे व्यावसायिक वा उद्योजक असतील ते सुद्धा मोठ्ठा गोठा तयार करून उत्तम धंदा म्हणून याकडे बघायचे. आजरोजी अनेक बदल झाले, चारा, पेंड, खाद्य आणि वैद्यकीय उपचार यांच्या किमंती भरमसाठ वाढल्या मुदलात दूधाची दरवाढ 50 पैसे ते 1 रूपया इतकीच वर्ष दीड वर्षाला वाढली. त्यामुळे पुढं जावून येत्या काही वर्षात बरंचंस चित्र वाईट असेल असे आजरोजी वाटत आहे.
गाय आणि म्हैस यांच्या सूरवातीपासून म्हणजेच रेडकू आणि वासरू यापासून बघू.
गायीच्या पाढीला पुर्ण वाढ होवून गर्भाशय तयार व्हायला दोन ते अडीच वर्ष लागतात.
रेडकाला तीन ते साडेतीन वर्ष लागतात.
ते झाल्याच्यानंतर ज्यावेळी लस सोडली जाते, त्यावेळी गर्भधारणा लगेच होईल की नाही याची शाश्वती देता येत नाही. त्यामूळे गायीसाठी हा काळ तीन आणि म्हैशीसाठी चार वर्षे धरू.
ह्या एवढ्या काळात शेण सोडलं तर दूसरं काही मिळत नाही. मात्र ह्या इतक्या कालावधीत चारा, पशुखाद्य, औषधपाणी, निगा करणारा माणूस ई गोष्टींवर प्रतिदिन शंभर रूपये खर्च येतो असे धरू. वर्षाला तीस हजार धरले तरी लाखभरापर्यंत हिशोब जातो. त्यानंतर दुग्धोत्पादन,
दूध ज्यावेळी प्रत्यक्षात डेअरीला जातं. त्यावेळी डिग्री, फॅट, SNF (solid not fat) इत्यादी परिमानावर दूधाचा दर ठरतो. जर आपल्याला दूध चांगलं पाहिजे तर त्याचप्रमाणात खाद्य घातलं पाहीजे, निगा केली पाहीजे. पण कितीही भरात असलं तरीही पहीली तीन महिनेच दूध बरं मिळतं. नंतर हे प्रमाण कमी होतं. रोजचा खर्च रोज फिटला (फिटत नाही ही वस्तूस्थिती) तरी आधीच्या वर्षांचं काय ?
ह्याचा विचार केला तर हा उद्योग परवडत नाही. शेणाचे पैसे होतंच नाहीत.
हे दूध संघ किंवा कंपन्या शेतकर्याकडून दूध घेताना फॅटवर घेतात. मात्र विकताना हायेस्ट दराने विकलं जातं. त्या दूधातले फॅट कंटेट काढून मगच ते पॅकिंग होतंय हे सर्वांनाच माहीतंय. यावर एकदा विचार झाला पाहीजे.
गाय 27 रूपये (पाच फॅट)
म्हैस 46 रूपये (दहा फॅट)
विक्रि अनुक्रमे 30,50 रूपये.
बायोगॅस ला शेण जास्त लागतं. त्यामुळे जास्त जनावर पाळावी लागतात. परत चारा, पशूखाद्य ई प्रश्न आहेच.
आजचे काही पशूखाद्यांचे दर
गहूभूसा 870
सरकीपेंड 1250
गोळीपेंड 1150
कणीसभूसा 900 रूपये.
हे एका जनावरास महिन्याला दोन पोती लागतात. हे दूभत्याकाळातंल झालं. भाकडकाळातही हाच खर्चा राहतो.
यावर विचार करायचा सोडून फडणवीस सरकार आणि कंपनी गायी जगवा म्हणतात. बरं जगवेनही पण निदान आधीपासूनच थोडं थोडं खर्चा दिला तर पुण्याई लागेल की गौमातेची.
आजरोजी हा व्यवसाय परवडत नाही. सरकार मुर्खपणाने काहीही निर्ण घेतंय. अंमलबजावणी नको ते करतंय. शेतकर्यांचे त्यांना सामिल झालेले नेते चिडीचुप्प बसून आहेत.
आता दूधदरवाढ झाली पाहीजे. नाहीतर उद्या गावातदेखील पाकीटातंल दूध प्यायचीच पाळी येईल. पाणी विकतंय 20 रूपये लिटरंनं. दूधही जोरात विकलं पाहीजे.






