बुधवार, ९ मार्च, २०१६

शिक्षण हे सगळ्या प्रश्नावरंच उत्तर नाहीच.

शिक्षण हे सगळ्या प्रश्नावरंच उत्तर नाहीच. शाळा काॅलेजात जावून नेमून दिलेली पुस्तक वाचून मार्क पाडणे ह्याला जर शिक्षण म्हणत असतील तर ते चुकीचे आहे. आजूबाजूला बरंच शिक्षण पडलंय. एक मित्र सातवीत शाळा सोडला धंद्यात पडला आजरोजी चारपाच कोटीचा मालक आहे. हे आर्थिकदृष्ट्या झालं. पण सामाजिकदृष्ट्या जरबघितल तर हिकडं तिकडं आजूबाजूला बरेच लोक शिकवणारे असतात. प्रत्येकाकडं कायनाकाय असतंय. ते बघून शिकता आलं पाहिजे. पास होत असताना एक चांगली सामाजिक, व्यावहारिक जाणिव होणं गरजेच आहे. खरं आपल्यात शिक्षण हे पोटासाठी आपल्या गरजा भागविण्यासाठी घेतलं जातंय. त्यात उत्सफुर्तपणा नाही. दबाव आहे, दबावातंन कायच चांगल घडू शकत नाही. मग नैराश्य येवून आत्महत्या होतात. यात आत्महत्या करणारे बरेच लोक युनव्हरसिटीतंन बाहेर पडून बाहेरच्या जगाबरोबर थेट संबंध आला की गडबडतात. तिथं फक्त शिक्षण फसतं. व्यावहारिक आणि सामाजिकस्थिती लक्षात यायला लोकांत मिसळाव लागतं. शिक्षणपद्धतीने हे बंद केलंय. अनेक माध्यमातले लोक सुद्धा मार खावून परतले आहेत.
शिक्षण गरजेचं आहे, पण त्याचबरोबर स्वतःचं असं कायतर पायजेल असल तर हिंडाव लागेल.
यातून विचार जाणून घ्यायला मदत हूईल. राजकारणात संवेदनशीलपणा आणि सुसंस्कृतपणा येईल. राजकारण हे पाहीजेच. मला तर वाटतंय पाचवीपासून राज्यशास्त्र हा विषय ठेवावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा