आज पवारसाहेब आलते शिरोळला सारे आजोबांच्या पुर्णाकृती पूतळ्याच्या अनावरनाला.
पवारसाहेब जिल्ह्यात, सांगलीत कुठंबी येणार असले की मला वैयक्तीक आनंद होतो. गाडी घेतो आणि सुटाळतो.
आज साडेतीनंच टायमिंग होतं. पवारसाहेब टायमात हजर होवून पुतळा अनावरन करून स्टेजवर गेले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा, पतंगराव कदम, सारे आजोबांचे जवळचे मित्र थोरात आणि डझनभर नेतेमंडळी होती.
प्रास्ताविक आवाडेदादांनी केलं. जे रटाळ असतं. त्याच्यानंतर थोरातांनी भाषन केलं. त्यांचा आवाज आणि तोंडावरचे एक्सप्रेशन बघण्याजोगे असतात.
मग पतंगराव कदमांचं भाषनसाठी नाव पुकारलं, पतंगराव लै मज्जा करतात. ऊठतानाच इजार वढत वढत ऊठले, परत माईक समोर येवून ऊभं राहिल्यावर एकदा वढले. मग एकेकाची पद्दशीर इज्जत काढत काढत उल्लेख केले. आमच्या आमदार उल्हास पाटलांची तर एवढी चेष्टा केली काय विचारू नका. नंतर म्हणटले.
दत्त कारखान्याचे संस्थापक दत्ताजीराव कदमांचा पूतळा सारे पाटलानी बसवला.
दिनकरराव यादवांचा पूतळा बसवला.
आत्ता आपन सगळ्यानी मिळून सारे पाटलांच पूतळा बसवलं.
कर्तृत्वान माणसाची पूतळं बसवतात.
मधेच त्यांना चंद्रकांत दादा दिसले. हे एकदा जे पट्टा चालु केला कदमांनी ते शेवटपर्यंत चंद्रकांतदादाना धूतंल.
म्हणटले. तुम्ही संघात असता. हाफ विजार काठ्या घिवून जाता. तिथं शिस्त शिकवत्यात. कडक शिस्त. तुमी बी लै कडक शिस्तवान रावं. मोदीस्नी सांगून तेवढं साखर कारखानदारीचं बघा की.
असं लै मजेदार भाषन केलं.
मग चंद्रकांत दादांच भाषन चालु झालं. चंद्रकांतदादा हा माणूस अगदी चतुर आहे. आपल्यावर आलेलं पद्धतशीरपणे पवारसाहेबांवर ढकलंल. म्हणटले मोदी माझ्यापेक्षा पवारसाहेबांच जादा ऐकतात. त्यांनाच सांगायला लावलं पाहीजे. चंद्रकांतदादांचे उच्चारसुद्धा स्प्षट असतात. तितकंच भाषनही मुद्देसुद.
त्यानंतर साहेबांचं भाषन.
साहेब म्हणटले,
पतंगराव कदम माणूस चांगलं आहेत. ते बोलायला लागलं की मला बी भ्या वाटत्या. आज भारती विद्यापीठाचं सर्वत्र नावं आहे. पतंगरावकडून नियोजन शिकलं पाहीजे.
नंतर चंद्रकांतदादांची तारिफ केली. आणि जी ठिणगी पडलीती ती विझवली. आज जगाच्या बाजारपेठेत साखरेची कंडीशन काय आहे. यावर त्यांनी थोडा वेळ बोलले. जपान मध्ये एका संशोधकांच्या टीमने एक नवीन ऊसाची प्रजात तयार केलीय. त्यात ऊसाला चाळीस दिवसातून एकदा पाणी दिलं की ते चालतंय. म्हणजे पाण्याची गरज अगदीच कमी. सरासरी 65टन उतारा प्रतिएकरी पडतो. आत्ता आपल्याकडे 34 उतारा आहे. आणि त्याचा साखर उताराही 12 आहे. त्या संशोधकांबरोबर काल साहेबांची चर्चा झाल्या. ते हिकडं आणायचं नियोजन चालु असल्याचं साहेबांनी सांगितलं.
साहेबांकडून घेण्याजोगं लै कायकाय आहे, इथंच बघा की दोन मिनटात पतंगरावांची भांडणं मिटवली. नवीन तंत्रज्ञानाविषयी सजगता दाखवली. एक खरं सांगतो, पवारसायबांच इमप्रेशन नादखुळाच पडतंय.
..
सा.रे पाटील आमच्या पलिकडच्या जांभळी गावातले. ते समाजवादी होते. विवीध क्षेत्रातली लोकं ओळखीची. नरेंद्र दाभोलकरांच्या चळवळीत होते. आणि बरंच काहीकाही.
ह्या लोकांकडंन बघून शिकलं पाहीजे असं वाटतंय. आज जे नुस्तेच साहेबांचे अनुयायी म्हणून मिरवणारे पांढर्या शर्टवाल्यांनी थोडफार इकडंतिकडंही पाहीलं तरी बरं होईल.
पवारसाहेब जिल्ह्यात, सांगलीत कुठंबी येणार असले की मला वैयक्तीक आनंद होतो. गाडी घेतो आणि सुटाळतो.
आज साडेतीनंच टायमिंग होतं. पवारसाहेब टायमात हजर होवून पुतळा अनावरन करून स्टेजवर गेले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा, पतंगराव कदम, सारे आजोबांचे जवळचे मित्र थोरात आणि डझनभर नेतेमंडळी होती.
प्रास्ताविक आवाडेदादांनी केलं. जे रटाळ असतं. त्याच्यानंतर थोरातांनी भाषन केलं. त्यांचा आवाज आणि तोंडावरचे एक्सप्रेशन बघण्याजोगे असतात.
मग पतंगराव कदमांचं भाषनसाठी नाव पुकारलं, पतंगराव लै मज्जा करतात. ऊठतानाच इजार वढत वढत ऊठले, परत माईक समोर येवून ऊभं राहिल्यावर एकदा वढले. मग एकेकाची पद्दशीर इज्जत काढत काढत उल्लेख केले. आमच्या आमदार उल्हास पाटलांची तर एवढी चेष्टा केली काय विचारू नका. नंतर म्हणटले.
दत्त कारखान्याचे संस्थापक दत्ताजीराव कदमांचा पूतळा सारे पाटलानी बसवला.
दिनकरराव यादवांचा पूतळा बसवला.
आत्ता आपन सगळ्यानी मिळून सारे पाटलांच पूतळा बसवलं.
कर्तृत्वान माणसाची पूतळं बसवतात.
मधेच त्यांना चंद्रकांत दादा दिसले. हे एकदा जे पट्टा चालु केला कदमांनी ते शेवटपर्यंत चंद्रकांतदादाना धूतंल.
म्हणटले. तुम्ही संघात असता. हाफ विजार काठ्या घिवून जाता. तिथं शिस्त शिकवत्यात. कडक शिस्त. तुमी बी लै कडक शिस्तवान रावं. मोदीस्नी सांगून तेवढं साखर कारखानदारीचं बघा की.
असं लै मजेदार भाषन केलं.
मग चंद्रकांत दादांच भाषन चालु झालं. चंद्रकांतदादा हा माणूस अगदी चतुर आहे. आपल्यावर आलेलं पद्धतशीरपणे पवारसाहेबांवर ढकलंल. म्हणटले मोदी माझ्यापेक्षा पवारसाहेबांच जादा ऐकतात. त्यांनाच सांगायला लावलं पाहीजे. चंद्रकांतदादांचे उच्चारसुद्धा स्प्षट असतात. तितकंच भाषनही मुद्देसुद.
त्यानंतर साहेबांचं भाषन.
साहेब म्हणटले,
पतंगराव कदम माणूस चांगलं आहेत. ते बोलायला लागलं की मला बी भ्या वाटत्या. आज भारती विद्यापीठाचं सर्वत्र नावं आहे. पतंगरावकडून नियोजन शिकलं पाहीजे.
नंतर चंद्रकांतदादांची तारिफ केली. आणि जी ठिणगी पडलीती ती विझवली. आज जगाच्या बाजारपेठेत साखरेची कंडीशन काय आहे. यावर त्यांनी थोडा वेळ बोलले. जपान मध्ये एका संशोधकांच्या टीमने एक नवीन ऊसाची प्रजात तयार केलीय. त्यात ऊसाला चाळीस दिवसातून एकदा पाणी दिलं की ते चालतंय. म्हणजे पाण्याची गरज अगदीच कमी. सरासरी 65टन उतारा प्रतिएकरी पडतो. आत्ता आपल्याकडे 34 उतारा आहे. आणि त्याचा साखर उताराही 12 आहे. त्या संशोधकांबरोबर काल साहेबांची चर्चा झाल्या. ते हिकडं आणायचं नियोजन चालु असल्याचं साहेबांनी सांगितलं.
साहेबांकडून घेण्याजोगं लै कायकाय आहे, इथंच बघा की दोन मिनटात पतंगरावांची भांडणं मिटवली. नवीन तंत्रज्ञानाविषयी सजगता दाखवली. एक खरं सांगतो, पवारसायबांच इमप्रेशन नादखुळाच पडतंय.
..
सा.रे पाटील आमच्या पलिकडच्या जांभळी गावातले. ते समाजवादी होते. विवीध क्षेत्रातली लोकं ओळखीची. नरेंद्र दाभोलकरांच्या चळवळीत होते. आणि बरंच काहीकाही.
ह्या लोकांकडंन बघून शिकलं पाहीजे असं वाटतंय. आज जे नुस्तेच साहेबांचे अनुयायी म्हणून मिरवणारे पांढर्या शर्टवाल्यांनी थोडफार इकडंतिकडंही पाहीलं तरी बरं होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा