यो यो, नमो आणि किम.....
...................................................
प्रत्येक जण इथ जगत असतो. म्हणजे त्याचा श्वाच्छोस्वास चालु असतो. प्रामाणिक असणे, नेक/नेकी असणे, कामात झोकून देणे, निष्ठेला जागणे, रमतगमत जगणे, सरळ जगणे अशा काही प्रचंड व्याख्या जगण्याच्या असतात. ज्याची त्याची निराळी. म्हणून इथे जगणे म्हणजे श्वाच्छोसवास चालू असणे असे धरू.
असे जगत असताना आपन लहानसहान प्रयत्न करत असतो. यश अपयश हे आपल्या प्रयत्नावर मिळत असतं.
आत्ताच अलिकडच्या काळात यो यो हनीसिंग हा तरूणाईच्या गळ्यातला ताईत झालाय ईतका की त्याचं नाव यो यो हनिसिंग असं घेतलं तरी बहूसंख्य तरूणाई चेकाळते. त्याच्या गुणांना नावं ठेवायचा कोणताही उद्देश इथे नाही. तरीही तो जी गाणी गातो त्यावर विचार करताना काय जाणवतं ? बर्यापैकी मुलांना प्रेम मिळत नसतं हे इथं जगजाहिर सत्य आहे. किंवा प्रेमात दगा मिळतो. फक्त हनिसिंग तो दगा किंवा ते प्रेम कसं सेलिब्रेट करायचं ते सांगत असतो. ब्रेक अप पार्टी हे बरंच गाजलेलं गाणं काय म्हणतंय ?
तिला कसा धडा शिकवणार ! मग तिची हालवस्था वगैरे काय होईल ? असं ते सुंदर (*) वर्णन केलेलं गाणं आहे. त्यामुळे ते आवडतंय असं म्हणटलं तर त्यात काय चुक ?
अलिकडेच म्हणजे दीड वर्षं झालेले आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी. नमो नमो किंवा मोदी मोदी (कृपया लालूंची एक्टींग आठवू नये.) असे नारे घुमत होते लाखो मुखातून ! निवडणुकपुर्व काळात आण्णा हजारेंच ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी आण्णा आण्णा किंवा मै हुँ आण्णा असे टोप्या घालणारे काय कमी होते का ?
तीच गर्दी कुठे वळली याचा नीट शोध घेतला तर अरविंद केजरीवालांच्या माकडचाळ्या खेळानंतर ती सरळ मोदींच्या मैदानात आली. आता जर त्यावेळचा काळ आठवला तर काय दिसतं ? इतकं काळं धन आहे ना त्यात प्रत्येकाला पंधरा लाख मिळणार आहे अशा बाता आपले पंतप्रधान मारायचे. आपली जनता सुद्धा अशी आहे की तिला भावनिक व्हायला एक मोदी, एक आण्णा नाहीतर एक यो यो लागतो.
त्याच मोदीवाटेने जनतेची वाटचाल पंतप्रधान पदाला मोदींना बसवून स्थिरावली. आत्ता त्या मेणबत्त्या आणि पणत्या कुठे गायब झाल्या ह्याचा थांगपत्ता लावणे तसे कठीण काम नाही.
काँग्रेस राजवटीत बोकाळलेल्या भष्टाचार आणि त्याच्या बातम्या या रोज कामावरून येवून टीव्ही बघून झोपणार्याला हैराण करायच्या. त्याप्रति त्या माणसाला चीड राग संताप आला नसेल तर नवलंच !
कालंच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ अखंड दूनिया हादरवून सोडणारा हायड्रोजन बाॅम्ब फोडला गेला आणि शेजारपाजारी देशात पळापळ चालु झाली. बर्याच देशांनी त्याचा निषेध केला. चीन हा त्यांचा दोस्तराष्ट्र त्यानंही निषेध (?) केला.
मुळात किम हे व्यक्तिमत्वंच अजब आहे. त्यांनी बर्याचदा भलभल्यांना घाम फोडलाय तसं बघितलं तर ही घटना रिश्टर स्केल वर घाम फोडली.
माणूस अपयशी ठरला की त्याला खापर फोडण्यासाठी कायतर हवं असतंच असतं. दगा दिलेल्या पोरीवर तिची काय अवस्था काय करू हे सांगणारा एक योयो.
पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर देणारा नमो.
आणि
आता कोण कुणाला कंटाळेल आणि त्याला किम आवडायला लागेल हे कळेल थोड्याच दिवसात.
...........................
...................................................
प्रत्येक जण इथ जगत असतो. म्हणजे त्याचा श्वाच्छोस्वास चालु असतो. प्रामाणिक असणे, नेक/नेकी असणे, कामात झोकून देणे, निष्ठेला जागणे, रमतगमत जगणे, सरळ जगणे अशा काही प्रचंड व्याख्या जगण्याच्या असतात. ज्याची त्याची निराळी. म्हणून इथे जगणे म्हणजे श्वाच्छोसवास चालू असणे असे धरू.
असे जगत असताना आपन लहानसहान प्रयत्न करत असतो. यश अपयश हे आपल्या प्रयत्नावर मिळत असतं.
आत्ताच अलिकडच्या काळात यो यो हनीसिंग हा तरूणाईच्या गळ्यातला ताईत झालाय ईतका की त्याचं नाव यो यो हनिसिंग असं घेतलं तरी बहूसंख्य तरूणाई चेकाळते. त्याच्या गुणांना नावं ठेवायचा कोणताही उद्देश इथे नाही. तरीही तो जी गाणी गातो त्यावर विचार करताना काय जाणवतं ? बर्यापैकी मुलांना प्रेम मिळत नसतं हे इथं जगजाहिर सत्य आहे. किंवा प्रेमात दगा मिळतो. फक्त हनिसिंग तो दगा किंवा ते प्रेम कसं सेलिब्रेट करायचं ते सांगत असतो. ब्रेक अप पार्टी हे बरंच गाजलेलं गाणं काय म्हणतंय ?
तिला कसा धडा शिकवणार ! मग तिची हालवस्था वगैरे काय होईल ? असं ते सुंदर (*) वर्णन केलेलं गाणं आहे. त्यामुळे ते आवडतंय असं म्हणटलं तर त्यात काय चुक ?
अलिकडेच म्हणजे दीड वर्षं झालेले आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी. नमो नमो किंवा मोदी मोदी (कृपया लालूंची एक्टींग आठवू नये.) असे नारे घुमत होते लाखो मुखातून ! निवडणुकपुर्व काळात आण्णा हजारेंच ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी आण्णा आण्णा किंवा मै हुँ आण्णा असे टोप्या घालणारे काय कमी होते का ?
तीच गर्दी कुठे वळली याचा नीट शोध घेतला तर अरविंद केजरीवालांच्या माकडचाळ्या खेळानंतर ती सरळ मोदींच्या मैदानात आली. आता जर त्यावेळचा काळ आठवला तर काय दिसतं ? इतकं काळं धन आहे ना त्यात प्रत्येकाला पंधरा लाख मिळणार आहे अशा बाता आपले पंतप्रधान मारायचे. आपली जनता सुद्धा अशी आहे की तिला भावनिक व्हायला एक मोदी, एक आण्णा नाहीतर एक यो यो लागतो.
त्याच मोदीवाटेने जनतेची वाटचाल पंतप्रधान पदाला मोदींना बसवून स्थिरावली. आत्ता त्या मेणबत्त्या आणि पणत्या कुठे गायब झाल्या ह्याचा थांगपत्ता लावणे तसे कठीण काम नाही.
काँग्रेस राजवटीत बोकाळलेल्या भष्टाचार आणि त्याच्या बातम्या या रोज कामावरून येवून टीव्ही बघून झोपणार्याला हैराण करायच्या. त्याप्रति त्या माणसाला चीड राग संताप आला नसेल तर नवलंच !
कालंच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ अखंड दूनिया हादरवून सोडणारा हायड्रोजन बाॅम्ब फोडला गेला आणि शेजारपाजारी देशात पळापळ चालु झाली. बर्याच देशांनी त्याचा निषेध केला. चीन हा त्यांचा दोस्तराष्ट्र त्यानंही निषेध (?) केला.
मुळात किम हे व्यक्तिमत्वंच अजब आहे. त्यांनी बर्याचदा भलभल्यांना घाम फोडलाय तसं बघितलं तर ही घटना रिश्टर स्केल वर घाम फोडली.
माणूस अपयशी ठरला की त्याला खापर फोडण्यासाठी कायतर हवं असतंच असतं. दगा दिलेल्या पोरीवर तिची काय अवस्था काय करू हे सांगणारा एक योयो.
पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर देणारा नमो.
आणि
आता कोण कुणाला कंटाळेल आणि त्याला किम आवडायला लागेल हे कळेल थोड्याच दिवसात.
...........................
...........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा