मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

थोडं कोल्हापूर विधानपरिषदेबद्दल.....

थोडं कोल्हापूर विधानपरिषदेबद्दल.....
अकरावर्षामागे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे कै. दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री होते. जिल्ह्याची बरीच सुत्रं ही महाडिकांकडे असत गोकुळ असो कि केडीडीसी बँक किंवा विधानसभा लोकसभा. खानविलकर लोकप्रिय होते, आरोग्यमंत्री असताना शासकीय हाॅस्पीटलांचा दर्जा सुधारण्याचं काम त्यांनी केलंत. अगदी सीपीआर देखील त्याकाळात त्यांनी बरंच आधूनिक केलतं. एकंदरीत त्यांचा प्रभाव वाढत होता त्यावेळी महाडिक आणि इतर काहीजणांनी त्यांच्याविरोधात बंटी पाटलाना बंडखोरी अर्थात अपक्ष मॅनेज करून बरंच पाठबळ देवून निवडूण दिलतं. त्याप्रसंगी पवारसाहेबांनी सांगितलं होतं असं करू नका पण केलंच. बंटी पाटील सुद्धा धडाडीचे. निवडूण आले बरीच कामं केली. दूसर्या टर्म ला परत निवडून आले. ते थेट गृहराज्यमंत्री झाले. पद्मश्री डी.वाय पाटलांचे ते चिरंजीव. दरम्यानच्या काळात महाडिकांचा त्यांनी पराभव केलता जे आज खासदार आहेत त्यांचा. बंटी विरूद्ध मुन्ना महाडिक हे समिकरण रूळलं. कार्यकर्ते दोघांचेही कट्टर.
सलग सत्तेचा सूकाळ आला कि माणूस बिघडतो. बंटी पाटील मंत्री झाले आणि स्थान मजबूत करत असतानाचं स्थानिक राजकारणात अगदी गावलेवलला सुद्धा अतिलक्ष घातलं त्यामुळं बरेच कार्यकर्ते दूरावले होते. कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर नेहमीच महाडिकांच्या मर्जीतला असायचा पण तिथंही बंटी पाटीलंच चमकले सलग दोनदा तिथला महाडीक प्रभाव झाकण्यात ते यशस्वी झाले. यात महाडिकांचा इगो हर्ट झाला. पण पुढे लोकसभा होती कागलचे सध्याचे आमदार आणि तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकरवी सतेज पाटलांचा पाठिंबा मिळवण्यात महाडिक यशस्वी झाले. महाडिकानी डाव साधला धनंजय खासदार झाले. बंटींचे आभारही मानले. अर्थातंच हे मिशन इमपाॅसिबल होतं. मोदीलाटेत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडूण येणं ही सहजसोपी गोष्ट नव्हती. पण ते बर्याच गोष्टीनी शक्य झालं, त्यात बंटी होते ही मोठी गोष्ट.
*************
तितक्यातंच विधानसभा वाजली. आता पैरा फेडायची पाळी महाडिकांची होती. पण ऐन वेळेला महाडिकांनी दगा केला आणि बंटी पाटीलांच्या विरूद्ध महादेवरावांचा पुत्र अंमल महाडिक हे भाजपाच्या तिकटावर
बंटी पाटलांविरूद्ध उतरले. त्यातंच मोदींची प्रचारसभा कोल्हापूरात झाली. आज जे लोक पैशाची गणितं मांडताहेत त्यांनी आवर्जून वर्षामागंचा काळ आठवावा. यातही महाडिक जिंकले. अंमल महाडिक हे आधीच जिल्हा परिषदेत होते. ती सिट रिकामी झाली, परत तिथल्याही पोटनिवडणुकीत अंमल यांच्याच पत्नी विजयी झाल्या.
आत्ता बघितलं तर महाडिकांच्या घरी पदे किती ???
एक खासदार (राष्ट्रवादी)
एक आमदार (भाजप)
एक आमदार (काँग्रेस)
एक झेड. पी सदस्य(काँग्रेस)
इतकी पद आणि राज्यातली मोठ्ठी दूधसंस्था गोकुळ ताब्यात.
सर्वत्र बंटी पाटील हरलेले. राजकारण एककल्ली वळणावर आलतं. पण वेळोवेळी विश्वासघात झालता पक्षाचा. अनेक लोकांचा. त्यातंच परवा कोल्हापूर मनपा ची ईलेक्शन त्यावेळी ही महाडिकांनी भाजपला जवळ केलं. एका बंटी पाटलानी काँग्रेसचा गड सांभाळला. अर्थात इथंच त्यांनी आजची गणितं आखली होती. मुश्रीफांनीही त्यांच्याशी युती करून पक्ष पैरा फेडला.
ती निवडणुक होते न होते तोच विधानपरिषदेच बिगूल वाजलं. ऊमेदवारी कुणाला यावर बराच खल झाला. यात पी.एन.पाटील, प्रकाश आवाडे इ होते. राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर होते.
बंटीना तिकीट फायनल झालं. पक्षश्रेष्ठीनी कार्याची पोचपावती दिली. ईकडं महाडिक बंडखोर झाले, भाजप आणि सेना सोबतीला होती. अर्ज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीचे यड्रावकरांची मुश्रीफानी समजूत काढली आणि माघार घेतली. महादेवराव तिथंच होते पण त्यांनी मुश्रीफांकडे ढुंकूनही पाहिलं नाही परिणामी मुश्रीफ यांनी बंटीना पाठिंबा दिला इथेच निम्मे फासे फिरले होते. बरीच आर्थिक उलाढाल अपेक्षेप्रमाणे झाली. आणि कोल्हापूरात 100% मतदान झालं. ज्यावेळी मतदान प्रमाणापेक्षा जास्त होतं त्यावेळी प्रस्थापिताला धोका होतो. नेमकं तेच झालं आणि आज बंटी विजयी झाले.
कितीही आर्थिक उलाढाल झाली तरी राजकारण हे राजकारणंच डाव साधता आलं पाहिजे. आणि हे कोल्हापूर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा