हिंसा.....
शुन्यात नजर ठेवून गेलेल्या काळाचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी नजर खोलात जावून अगदी प्राचीन काळात जाते. ज्यावेळी माणूस अप्रगत होता. त्यावेळी त्याचं जीवन, खाणं, पिणं, जगनं कसं असेल ? असे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. सुरवातीला माणूस खाण्यासाठी मांस आणि कंदमुळे यावरच अवलंबून होता हे नाकारून चालणार नाही. तत्कालीन चित्रं, फाॅसिल्स, शिल्प यावरून ते स्पष्ट होतं.
आता मुद्दा असा आहे की, त्याकाळात संपुर्ण मानवजात ही मांसाहार करत /घेत होती. साहजिकच मांसाहार हे चटकदार असतं. त्याची सवय मोडणे कठिण काम. पण त्याकाळात शाकाहार किंवा अहिंसा ही मुल्यं रूजवनं तितकं सोप्पं काम होतं का ?
पंचेंद्रिय असलेल्या प्राण्यांबाबत सहानुभूती, निर्माण करणे ही त्याकाळातली भलीमोठी क्रांतिच मानावी लागेल. बुद्ध, भगवान महावीर यांनी त्या काळात मांडलेला विचार आजही पूजनीय आहे.
अगदी अलिकडंच पहायला गेलं तर या शेदोनशे वर्षातला मोठा माणूस जर कोण असेल तर तो महात्मा गांधी. आजही जगाच्या कानाकोपर्यात पूतळ्यांची अनावरनं होताहेत, नोटावर गांधी अशा ठिकाणी ते अढळ आहेत. अहिंसा हे मूल्य त्यांनी जपलं, पोसलं, वृद्धिंगत केलं.
त्यांच्या हत्येनंतर काय झालं हे प्रत्यक्ष जगानं पाहिलंय. गांधींच्या हत्येनंतर झालेल्या हत्याकांडातील हत्यारे हे गांधीवादी असतील का ?
शोषक हिंसा, प्रतिकात्मक हिंसा, प्रत्युत्तरादाखल केलेली हिंसा हे प्रकार तुर्तास बाजूला ठेवू.
जन्मापासून माझ्या पिढीने ज्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या गोष्टीत पराक्रम म्हणजेच दृष्टांचा नाश. हे आम्ही ऐकलं किंवा पाहिलं त्यातून आम्हाला स्फूरण चढून अंगावर काटे यायचे ही सत्यपरिस्थिती. कृष्णानं अर्जुनाला सांगितलं 'हा सुर्य हा जयद्रथ ऊडव त्याचे मुंडके',
किंवा छत्रपति शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना अफजलखानाचा वधच सारखा रिपीट वाचने.
किंवा 'देवधर्मापायी प्राण घेतलं हाती !' याच गोष्टीभोवती रेंगाळत बसने. हे होते. बर्याच जणांना याचा अनुभव आहे. अगदी अलिकडे व्हिलन नसलेल्या चित्रपटांची अवस्था काय असते ?
अन्यायाच्या कथा, पिळवणूकीचा राग, जन्मोजन्मीचा कपोकल्पित ईतिहास याचा मोठ्ठा पगडा आपल्या समाजावर आहे. आज जे काही आतिरेकी, दहशतवादी, धार्मीक, जातीय, ऑनर किलींग, वर्चस्ववादातून झालेल्या हत्या यांचा मागोवा घेतला तर काय दिसून येतं ?
शुद्ध मुर्खपणा, हतबुद्ध हतबल मानसिकता आणि अन्याय झालेली भावना यापलिकडे कोणतीच मानसिकता नाही.
राजकीय हत्या या अशा असतात की त्याचे हत्यारे कधीच सापडत नाहीत. त्या हत्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्या संगनमतानेच झालेल्या असतात. त्यावेळी अगदी कितीही आधूनिकरित्या तपास घेतला तरी त्याचे हत्यारे सापडत नाहीत. किंवा शोधले जात नाहीतंच.
आजच्या घडीला या देशात रोज नवनविन हत्या घडत असतात. ब्रेकिंग न्युज येत असतात कुठल्या हत्या हत्याकांड ध्यानात ठेवायचं झालं तर ते ही तितक सोप्पं नाहीय. इतक्या प्रचंड वेगाने बातम्यांचा भडिमार होत आहे. अशा कोण कुठला पाठपूरावा करणार ? आणि ज्या त्या आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फासावर चढविणार ?
अलिकडं एकवेळ फास बरा पण पोलिसानी केलेला छळ नको अशी अवस्था आहे. कायदा हा सामान्य माणसाला पोलिसापासून वाचवण्यासाठी आहे, इतपत कायदा नजरेत आहे.
.... महात्म्याच्या जयंतीला हातात खराटा देवून अहिंसा पद्धतशीर लपविने, देशापरदेशात जावून भुरट्या स्वच्छतेची मोहिम आखून चकचकीत रोडवर झाडू मारण्याचा निर्ल्लजपणा ज्यावेळीस वाढायला लागतो त्यावेळी देशातला स्वंघोषित महात्मा (!) ही धोतराचा सोगा तोंडात घालून निपचित पडतो.
अहिंसेला षंढपणाचा प्रतिक करण्याचं काम षंढांकडून जोरदार चालू आहे. सावध असा
आता मुद्दा असा आहे की, त्याकाळात संपुर्ण मानवजात ही मांसाहार करत /घेत होती. साहजिकच मांसाहार हे चटकदार असतं. त्याची सवय मोडणे कठिण काम. पण त्याकाळात शाकाहार किंवा अहिंसा ही मुल्यं रूजवनं तितकं सोप्पं काम होतं का ?
पंचेंद्रिय असलेल्या प्राण्यांबाबत सहानुभूती, निर्माण करणे ही त्याकाळातली भलीमोठी क्रांतिच मानावी लागेल. बुद्ध, भगवान महावीर यांनी त्या काळात मांडलेला विचार आजही पूजनीय आहे.
अगदी अलिकडंच पहायला गेलं तर या शेदोनशे वर्षातला मोठा माणूस जर कोण असेल तर तो महात्मा गांधी. आजही जगाच्या कानाकोपर्यात पूतळ्यांची अनावरनं होताहेत, नोटावर गांधी अशा ठिकाणी ते अढळ आहेत. अहिंसा हे मूल्य त्यांनी जपलं, पोसलं, वृद्धिंगत केलं.
त्यांच्या हत्येनंतर काय झालं हे प्रत्यक्ष जगानं पाहिलंय. गांधींच्या हत्येनंतर झालेल्या हत्याकांडातील हत्यारे हे गांधीवादी असतील का ?
शोषक हिंसा, प्रतिकात्मक हिंसा, प्रत्युत्तरादाखल केलेली हिंसा हे प्रकार तुर्तास बाजूला ठेवू.
जन्मापासून माझ्या पिढीने ज्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या गोष्टीत पराक्रम म्हणजेच दृष्टांचा नाश. हे आम्ही ऐकलं किंवा पाहिलं त्यातून आम्हाला स्फूरण चढून अंगावर काटे यायचे ही सत्यपरिस्थिती. कृष्णानं अर्जुनाला सांगितलं 'हा सुर्य हा जयद्रथ ऊडव त्याचे मुंडके',
किंवा छत्रपति शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना अफजलखानाचा वधच सारखा रिपीट वाचने.
किंवा 'देवधर्मापायी प्राण घेतलं हाती !' याच गोष्टीभोवती रेंगाळत बसने. हे होते. बर्याच जणांना याचा अनुभव आहे. अगदी अलिकडे व्हिलन नसलेल्या चित्रपटांची अवस्था काय असते ?
अन्यायाच्या कथा, पिळवणूकीचा राग, जन्मोजन्मीचा कपोकल्पित ईतिहास याचा मोठ्ठा पगडा आपल्या समाजावर आहे. आज जे काही आतिरेकी, दहशतवादी, धार्मीक, जातीय, ऑनर किलींग, वर्चस्ववादातून झालेल्या हत्या यांचा मागोवा घेतला तर काय दिसून येतं ?
शुद्ध मुर्खपणा, हतबुद्ध हतबल मानसिकता आणि अन्याय झालेली भावना यापलिकडे कोणतीच मानसिकता नाही.
राजकीय हत्या या अशा असतात की त्याचे हत्यारे कधीच सापडत नाहीत. त्या हत्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्या संगनमतानेच झालेल्या असतात. त्यावेळी अगदी कितीही आधूनिकरित्या तपास घेतला तरी त्याचे हत्यारे सापडत नाहीत. किंवा शोधले जात नाहीतंच.
आजच्या घडीला या देशात रोज नवनविन हत्या घडत असतात. ब्रेकिंग न्युज येत असतात कुठल्या हत्या हत्याकांड ध्यानात ठेवायचं झालं तर ते ही तितक सोप्पं नाहीय. इतक्या प्रचंड वेगाने बातम्यांचा भडिमार होत आहे. अशा कोण कुठला पाठपूरावा करणार ? आणि ज्या त्या आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फासावर चढविणार ?
अलिकडं एकवेळ फास बरा पण पोलिसानी केलेला छळ नको अशी अवस्था आहे. कायदा हा सामान्य माणसाला पोलिसापासून वाचवण्यासाठी आहे, इतपत कायदा नजरेत आहे.
.... महात्म्याच्या जयंतीला हातात खराटा देवून अहिंसा पद्धतशीर लपविने, देशापरदेशात जावून भुरट्या स्वच्छतेची मोहिम आखून चकचकीत रोडवर झाडू मारण्याचा निर्ल्लजपणा ज्यावेळीस वाढायला लागतो त्यावेळी देशातला स्वंघोषित महात्मा (!) ही धोतराचा सोगा तोंडात घालून निपचित पडतो.
अहिंसेला षंढपणाचा प्रतिक करण्याचं काम षंढांकडून जोरदार चालू आहे. सावध असा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा