शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

भ्रष्टाचार !!!!

भ्रष्टाचार !!!!
अर्थविशेष म्हणून एक दिवाळी अंक यायचा. एकवर्षी म्हणजे अलिकडे तीन वर्षापूर्वी त्यांनी 'भ्रष्टाचार' म्हणून एक विषय घेवून त्या त्या पंतप्रधानपदाच्या काळातील झालेले भ्रष्टाचारासंबंधीचे मोठ्ठे पूस्तक केलते. ते खरंही असेल, नाही असं नाही. 
अगदी सर्व माणसांना 'दूसर्यानी केलेल्या भ्रष्टाचारावर' राग असतोच. सलग चारपाच वर्षाअलिकडचे वृतपत्र बघितले तर त्यातही सर्व स्तराच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या सापडतील. म्हणजे गावातला तलाठी, वीज कर्मचारी, अधिकारी ते थेट तहसिलदार, जिल्हाधिकारी वगैरे. एकेक लोक तर इतके मोठ्ठे झाले ते काय विचारायला नको इतके. दहा पंधरा लाख बोडक्यावर कर्ज असताना, आज ते लोक चारचाकी, बंगला, नदीचं पाईपलाईन, घरात उत्तमसुखसोईनियूक्त जीवन जगत आहेत. हे खेड्यातले छोटे पुढारी. त्यांना मान आहे, हारतूरे, एखादा समाजसेवेचा किंवा कृषिभूषण असला एखादा पूरस्कार, शालश्रीफळ, अडाणचोटाला संस्कृतमधलं, इंग्रजीतलं न वाचता येणारं मानपत्र वगैरे मिळते आहे. वाढदिवसाला स्टँडवर फ्लेक्स इ.
हे मिळवण्यात फारसं काही कर्तृत्व आहे अशातला भाग नाही. काहीजण यात शुन्यातंन वर येतात तर काहीजण बापाच्या जीवावरलं एखादं विकून मोठ्ठा होतो. यात फारसा शहाणपणा नाही. फक्त धाडस, गुंडगिरी आणि मुर्खपणा. यांच्याविरूद्ध आवाज उठवणार्याला हे विविध प्रकाराने दबावात आणून संपवतात. हे सत्य आहे. पैशासाठी लाचार झालेले अधिकारी आणि पोलिस त्याला काही भिरकावडलेल्या तूकड्यांसाठी मदत करतात. हे सगळे हरामी लोक मिळून त्या आवाज उठवणार्याला संपवायला मदत करतात. कधीकधी कायदा हा पोलिसापासून सामान्य माणसाला वाचवायला आहे असे वाटते. असे लोक गल्लोगल्ली तयार झालेत. बदल्यात आवाज ऊठवणाराही प्रामाणिक असला तर...? ईलेक्शन लढवणे हे आजघडीला पैशावाचून शक्य नाही असे चित्र. अशी भिषन परिस्थिती आज ओढावली आहे. हे काही एका खेड्याच चित्र नसून हेच अखंड भारतात चालत आहे. आमदार खासदार आणि एकेकाळचे मंत्री लोकही यात शामिल आहेत.
सामान्य माणूस काय करेल मग ?
एखाद्या सिंघम किंवा दबंग सिनेमाची तिकीट ब्लॅक नं घेवून टाळ्या पिटून बाहेर पडेल. यावर काही नाही. पण हाच रोष रस्त्यावरही आलेला एकदा पण त्याचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात गेलं, आणि त्यांचे उपचारही भयानक होते. याच रोषाला एक दिशा व्यवस्थित मिळाली तर पैसे घेताना आणि निर्लल्जपणे वागताना चळाचळा हिच लोक कापली असती. भ्रष्टाचाराच्या आरोपातले खरे आरोप सिद्ध होणे ही पायरी महत्वाची. तसा सापडला तर कोणताही मुलाहिजा न राखता कठोर शासन अशा लोकांस झालं पाहिजे. तिथे कुठली अस्मिता आड येता कामा नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा