रोहित वेमुल या युवकाने आत्महत्या केली. त्याच्यानंतर देशातलं वातावरण ढवळून निघालं.
माणूस जगत असताना त्याच्या अशा कृत्याला आजूबाजूची परिस्थिती जबाबदार असते. रोहितंच पत्र वाचलं की ते लक्षात येईल असं नाही. तो त्यात लिहतो की कुणालाही जबाबदार धरू नये. ही गोष्ट दुर्लक्षून चालणार आहे का ?
त्यापुर्वी आधीच्या घटनांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. आधी वाद झाले. अभाविप च्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. थेट केंद्रीय मंत्रालयातून विद्यापिठावर दबाव आले. आणि विद्यापीठातून रोहीत आणि इतर चौघांचं निलंबन करण्यात आलं.
हा निर्णय संविधानिक मार्गाने घेतलं असल्याचं केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाचं म्हणनं आहे.
आता स्पष्ट हे आहे की यात केंद्रीय मंत्रलयाचा सहभाग आहे. अभाविप च्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीची इतकी उत्साही दखल घेण्याचं काम हे मंत्रालय कसं करू शकतंय ? हा मुळ प्रश्न आहे. याचे उत्तरही फारसे अवघड नाही. अभाविप ही सत्तेत असलेल्यांचीच एक टोळी. सत्तेत असणारे सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मनसुबे हे गेल्या काही दिवसात स्पष्ट होताना दिसत आहे.
रात्रभर न्यायालय चालवून याकुब मेमनला फासावर चढविणे. (याकुबबद्दल आम्हाला आत्मियता आहे किंवा याकुबप्रेमी आहोत असा अर्थ घेवू नये.)
अखलाक या मुस्लीम व्यक्तीच्या हत्येत कोणाचा हात होता ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज शोधताना विकासाच्या फ्री गप्पांची किव येते.
मोदी यांना अखंड जगाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे की काय ? असा प्रश्न पडतो. इतके हे विदेश दौर्यात मश्गुल आहेत. तिथे जावूनही यांची छप्पनइंची वकत्व्ये थांबली नाहीत. ह्यांना आधी भारतीय असल्याची लाज वाटत होती हे जाहिर वक्तव्य आपल्या पंतप्रधानांचं आहे. आज हे पंतप्रधान होवून पावणेदोन वर्ष झाली. काय अभिमानाने टेंभा मिरवण्याजोगे यांचे कार्य आहे ?
लोकशाहीचा होताहोईल इतका गळा घोटण्याचे कार्य अत्यंत पद्धतशीरपणे चालू आहे. ह्याची सुरवात खूप आधीपासूनची आहे. मै हिंदू राष्ट्रवादी हुँ ! ते गांधी जयंतीला अहिंसा लपवून ठेवून पद्धतशीरपणे खराटा जनतेच्या हाती देत लोकशाहीची लोटझाड यांनी सुरू केलीये. तिथे सनातन सारख्या संस्थावर बंदी घाला ही अपेक्षा या लोकांकडून करणे हे चुकीचे ठरते.
आजउद्या जर हे धार्मिक जातीय प्रदूषन ज्ञान गंगेत डुबकी मारून पवित्र व्हायचे ठरवत असेल तर उद्या ह्याच तरूणाईच्या हातात बंदूकी येतील.
आता खरीच कुणाला लाज वाटते याचा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर हिशोब होणे गरजेचे आहे. 20 january
माणूस जगत असताना त्याच्या अशा कृत्याला आजूबाजूची परिस्थिती जबाबदार असते. रोहितंच पत्र वाचलं की ते लक्षात येईल असं नाही. तो त्यात लिहतो की कुणालाही जबाबदार धरू नये. ही गोष्ट दुर्लक्षून चालणार आहे का ?
त्यापुर्वी आधीच्या घटनांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. आधी वाद झाले. अभाविप च्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. थेट केंद्रीय मंत्रालयातून विद्यापिठावर दबाव आले. आणि विद्यापीठातून रोहीत आणि इतर चौघांचं निलंबन करण्यात आलं.
हा निर्णय संविधानिक मार्गाने घेतलं असल्याचं केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाचं म्हणनं आहे.
आता स्पष्ट हे आहे की यात केंद्रीय मंत्रलयाचा सहभाग आहे. अभाविप च्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीची इतकी उत्साही दखल घेण्याचं काम हे मंत्रालय कसं करू शकतंय ? हा मुळ प्रश्न आहे. याचे उत्तरही फारसे अवघड नाही. अभाविप ही सत्तेत असलेल्यांचीच एक टोळी. सत्तेत असणारे सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मनसुबे हे गेल्या काही दिवसात स्पष्ट होताना दिसत आहे.
रात्रभर न्यायालय चालवून याकुब मेमनला फासावर चढविणे. (याकुबबद्दल आम्हाला आत्मियता आहे किंवा याकुबप्रेमी आहोत असा अर्थ घेवू नये.)
अखलाक या मुस्लीम व्यक्तीच्या हत्येत कोणाचा हात होता ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज शोधताना विकासाच्या फ्री गप्पांची किव येते.
मोदी यांना अखंड जगाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे की काय ? असा प्रश्न पडतो. इतके हे विदेश दौर्यात मश्गुल आहेत. तिथे जावूनही यांची छप्पनइंची वकत्व्ये थांबली नाहीत. ह्यांना आधी भारतीय असल्याची लाज वाटत होती हे जाहिर वक्तव्य आपल्या पंतप्रधानांचं आहे. आज हे पंतप्रधान होवून पावणेदोन वर्ष झाली. काय अभिमानाने टेंभा मिरवण्याजोगे यांचे कार्य आहे ?
लोकशाहीचा होताहोईल इतका गळा घोटण्याचे कार्य अत्यंत पद्धतशीरपणे चालू आहे. ह्याची सुरवात खूप आधीपासूनची आहे. मै हिंदू राष्ट्रवादी हुँ ! ते गांधी जयंतीला अहिंसा लपवून ठेवून पद्धतशीरपणे खराटा जनतेच्या हाती देत लोकशाहीची लोटझाड यांनी सुरू केलीये. तिथे सनातन सारख्या संस्थावर बंदी घाला ही अपेक्षा या लोकांकडून करणे हे चुकीचे ठरते.
आजउद्या जर हे धार्मिक जातीय प्रदूषन ज्ञान गंगेत डुबकी मारून पवित्र व्हायचे ठरवत असेल तर उद्या ह्याच तरूणाईच्या हातात बंदूकी येतील.
आता खरीच कुणाला लाज वाटते याचा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर हिशोब होणे गरजेचे आहे. 20 january
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा