इथं जगताना......
भारत देश विवीध समूहांच्या धर्माजातीनी बनलेला देश आहे. त्यात बहूसंख्याक, अल्पसंख्याक ही वर्गवारी. त्याच्यानंतर एकाच धर्माच्या अनेक पोटजाती. त्यांच्या विवीध चालीरीतीरूढी.
धर्म ही पूरातन संकल्पना आहे. तिचा शोध लावणारा त्या काळात भल्यासाठीच लावला असेल. कुठेतरी एकोपा नांदेल या दृष्टीकोनातून. जून्या गोष्टी गेल्या किंवा जात राहिल्या. परंतु धर्मजात ही गोष्ट काही केल्या गेली नाही. तिचं उद्दातीकरण, किंवा नवनव्या संकल्पना येत राहिल्या. ज्या धर्मात मुर्तिपुजा वर्ज्य होती, त्याही मुर्तीपूजेकडे धर्म टिकविण्याच्या भावनेने वळल्या. अर्थात आपल्याला धर्माच्या तत्वज्ञानाशी काही देणघेणं नसतं. त्याच मुळ अज्ञानात आहे. देव सूरवातीला झाले. (म्हणजे ते असतील वा नसतील.)
त्याचं नवं रूप जे आपल्याकडं आलं ते भयंकर आणि तितकच भंपक. हाडामांसाच्या माणसानी ज्यांनी इथं घरावर तुळशीपत्र ठेवून समस्त जनकल्याणार्थ कार्य केलं. ती व्यक्ती सर्वांसाठी कार्य करते आहे हे विसरून त्याला आपल्या धर्मात अथवा जातीत बंदिस्त केल्यानं त्या महापूरषाबद्दल मर्यादा आणण्याचं पद्धतशीर काम झालं. एका जातीधर्माइतकीच त्याची मर्यादा झाली. त्यातून त्याच्या इतर पैलूंचे आकलन होण्यास मर्यादा आल्या हे मान्य करावे लागते.
आज प्रगतिच्या वा विकासाच्या वाटेवरून जग आगेकूच करत असताना आपल्या धार्मिक भावनाही तितक्याच प्रखर बनत चालल्या आहेत. यात कुणीच मागे नाही. माणसांनी इथं जी आधूनिक क्रांति केली ती इंटरनेट, इलेक्ट्रानिक माध्यम यावरूनही देवाधिकांचा प्रसार चालु असतो अविरतपणे. यास मुर्खपणा म्हणायचा की आणखी काय ? असे बरेच प्रश्न येताहेत.
ज्यासमयी या राष्ट्रात राजेशाही होती तेव्हां इथे धर्माधिष्ठीता गैरलागू होती, कलागुण, बुद्धिवंत असणारा माणूस त्याची हूशारी दाखवून राजाच्या दरबारातली मानाची पदं मिळवत होता. त्यावेळेस जात्यंधता नव्हती, जे जे कल्याणकारी असेल ते ते राज्य पुढे जाण्यास उपयोगात आणले जायचे. त्यावेळेस कुठला भेद आणि कुठला सेक्युल्यारिझम ?
असं काहीही नव्हतं. परंतू नंतरच्या काळात आपापल्या सोईने जसे होईल तसे त्या ईतिहासकाराने मांडावयाचे चाळे केले. त्यात आम्हा भारतीयाना एक नायक आणि एक खलनायक राम रावणापासून सिंघम जयंकांत शिकरे पर्यंत लागतो. मनोरंजनाचे ठिक. परंतू ईतिहासात जो अतिरंजितपणा आलेला आहे त्याने ईतिहासाकडे बघण्याची तटस्थवृती आपन हरवून बसलेलो आहेत. या रंजनाच्या मोहापायीच ईतिहासामुळे उन्मादित उद्दामपणा पावलोपावली ठसला गेलाय. वरतून त्या नायकांना जातीधर्माच्या तबेल्यात डांबलं गेलं. त्या धर्मजातीचा तो त्याचा अनुयायी असे होत गेले. परधर्मजातीचा तो शत्रु हे कुठतरी बिंबवल किंवा बिंबल गेलं. यातूनच आजपर्यंत बरेच संघर्ष उदभवले आणि उदभवताहेत.
................................................
शेवट :
आजघडीला या देशातून, जगातून देवधर्म हद्दपार करणे. ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही. आपला मेंदू विकसित झालाय. तटस्थपणे, कोणताही अंह मनात न आणता एखाद्या गोष्टीकडे बघण्याची सवय लागली पाहीजे. यातूनच जिज्ञासूवृत्ती वाढते. जाणिवा समृद्ध होतात. कुठल्याच मर्यादा न पाळता केलेलं काम हे समाधान देणारं आहे. जग जवळ आलंय. कित्येक नव्या गोष्टीचे आदानप्रदान होऊ शकते. जे आपल्याला समृद्धीकडे नेत असते. आपलं कुठं चूकतंय किंवा दूसर्याच बघून आपणास काय सूधारणा करता येवू शकतात ह्या आता बघणे आपल्या हातात आहे. द्वेषबूद्धीने मेंदू मंद पडतो. जरी देवधर्म हद्दपार होणार नसतील तरी आपन एकमेकाच्या भावनांचा आदर करण्याइतके निश्चित प्रगल्भ झालोय. ह्या अशाच मार्गाने गेलो तर एकदिवस देवधर्म ही शेपटी सारखे गळून पडतील. बदल घडवला पाहीजे.
भारत देश विवीध समूहांच्या धर्माजातीनी बनलेला देश आहे. त्यात बहूसंख्याक, अल्पसंख्याक ही वर्गवारी. त्याच्यानंतर एकाच धर्माच्या अनेक पोटजाती. त्यांच्या विवीध चालीरीतीरूढी.
धर्म ही पूरातन संकल्पना आहे. तिचा शोध लावणारा त्या काळात भल्यासाठीच लावला असेल. कुठेतरी एकोपा नांदेल या दृष्टीकोनातून. जून्या गोष्टी गेल्या किंवा जात राहिल्या. परंतु धर्मजात ही गोष्ट काही केल्या गेली नाही. तिचं उद्दातीकरण, किंवा नवनव्या संकल्पना येत राहिल्या. ज्या धर्मात मुर्तिपुजा वर्ज्य होती, त्याही मुर्तीपूजेकडे धर्म टिकविण्याच्या भावनेने वळल्या. अर्थात आपल्याला धर्माच्या तत्वज्ञानाशी काही देणघेणं नसतं. त्याच मुळ अज्ञानात आहे. देव सूरवातीला झाले. (म्हणजे ते असतील वा नसतील.)
त्याचं नवं रूप जे आपल्याकडं आलं ते भयंकर आणि तितकच भंपक. हाडामांसाच्या माणसानी ज्यांनी इथं घरावर तुळशीपत्र ठेवून समस्त जनकल्याणार्थ कार्य केलं. ती व्यक्ती सर्वांसाठी कार्य करते आहे हे विसरून त्याला आपल्या धर्मात अथवा जातीत बंदिस्त केल्यानं त्या महापूरषाबद्दल मर्यादा आणण्याचं पद्धतशीर काम झालं. एका जातीधर्माइतकीच त्याची मर्यादा झाली. त्यातून त्याच्या इतर पैलूंचे आकलन होण्यास मर्यादा आल्या हे मान्य करावे लागते.
आज प्रगतिच्या वा विकासाच्या वाटेवरून जग आगेकूच करत असताना आपल्या धार्मिक भावनाही तितक्याच प्रखर बनत चालल्या आहेत. यात कुणीच मागे नाही. माणसांनी इथं जी आधूनिक क्रांति केली ती इंटरनेट, इलेक्ट्रानिक माध्यम यावरूनही देवाधिकांचा प्रसार चालु असतो अविरतपणे. यास मुर्खपणा म्हणायचा की आणखी काय ? असे बरेच प्रश्न येताहेत.
ज्यासमयी या राष्ट्रात राजेशाही होती तेव्हां इथे धर्माधिष्ठीता गैरलागू होती, कलागुण, बुद्धिवंत असणारा माणूस त्याची हूशारी दाखवून राजाच्या दरबारातली मानाची पदं मिळवत होता. त्यावेळेस जात्यंधता नव्हती, जे जे कल्याणकारी असेल ते ते राज्य पुढे जाण्यास उपयोगात आणले जायचे. त्यावेळेस कुठला भेद आणि कुठला सेक्युल्यारिझम ?
असं काहीही नव्हतं. परंतू नंतरच्या काळात आपापल्या सोईने जसे होईल तसे त्या ईतिहासकाराने मांडावयाचे चाळे केले. त्यात आम्हा भारतीयाना एक नायक आणि एक खलनायक राम रावणापासून सिंघम जयंकांत शिकरे पर्यंत लागतो. मनोरंजनाचे ठिक. परंतू ईतिहासात जो अतिरंजितपणा आलेला आहे त्याने ईतिहासाकडे बघण्याची तटस्थवृती आपन हरवून बसलेलो आहेत. या रंजनाच्या मोहापायीच ईतिहासामुळे उन्मादित उद्दामपणा पावलोपावली ठसला गेलाय. वरतून त्या नायकांना जातीधर्माच्या तबेल्यात डांबलं गेलं. त्या धर्मजातीचा तो त्याचा अनुयायी असे होत गेले. परधर्मजातीचा तो शत्रु हे कुठतरी बिंबवल किंवा बिंबल गेलं. यातूनच आजपर्यंत बरेच संघर्ष उदभवले आणि उदभवताहेत.
................................................
शेवट :
आजघडीला या देशातून, जगातून देवधर्म हद्दपार करणे. ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही. आपला मेंदू विकसित झालाय. तटस्थपणे, कोणताही अंह मनात न आणता एखाद्या गोष्टीकडे बघण्याची सवय लागली पाहीजे. यातूनच जिज्ञासूवृत्ती वाढते. जाणिवा समृद्ध होतात. कुठल्याच मर्यादा न पाळता केलेलं काम हे समाधान देणारं आहे. जग जवळ आलंय. कित्येक नव्या गोष्टीचे आदानप्रदान होऊ शकते. जे आपल्याला समृद्धीकडे नेत असते. आपलं कुठं चूकतंय किंवा दूसर्याच बघून आपणास काय सूधारणा करता येवू शकतात ह्या आता बघणे आपल्या हातात आहे. द्वेषबूद्धीने मेंदू मंद पडतो. जरी देवधर्म हद्दपार होणार नसतील तरी आपन एकमेकाच्या भावनांचा आदर करण्याइतके निश्चित प्रगल्भ झालोय. ह्या अशाच मार्गाने गेलो तर एकदिवस देवधर्म ही शेपटी सारखे गळून पडतील. बदल घडवला पाहीजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा