गुरुवार, ३ मार्च, २०१६

सर्वोच्च न्यायालयातले बैल !!!!!


काही दिवसांपुर्वी प्राणीमित्रांच्या दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आणि या आधी गोहत्याबंदी राज्यात आणली गेली. याप्रसंगी ह्यावर विचार करावयास हवा असे वाटते. 
बैलगाडी शर्यतीची परंपरा ही दोनशे वर्षापुर्वीची. बैल पाळणारे हे नव्वद टक्क्याहून अधिक लोक शेतकरी. सुरवातीला मनोरंजन अथवा क्रिडाप्रकार म्हणून या शर्यत्या प्रचलित झाल्या. वर्षाचे बारमाही काम काय बैलांचे नसते. शेतीची मशागत, नांगरणी, कुळवनी, पेरणी आणि शेतमालाची वाहतूक अथवा जिथे प्रवासाची काहीच साधने नाहीत अशा आडवळणी ठिकाणच्या प्रवासास बैलगाडी वाहतुक सुसह्य असायची. अलिकडे ही परिस्थिती बदलली. जी शेती बैलांवर अवलंबून होती तीपैकी साधारणतः नव्वद टक्के शेती ही यांत्रीकीकरणाखाली आली आणि बैल ह्या प्राण्याची उपयुक्तता हळूहळू कमी होवू लागली. हे सर्वांगसत्य मान्य करावयास कुणाची हरकत नसावी. 
आता जर भवतालची खेडीपाडी पाहिली तर जी मंडळी आज वयवर्षे तीस ते चाळीस ची आहेत त्यांना हे सहजी ध्यानात येईल. 
बैलगाडी शर्यत ही सुरवातीस प्रचलित झाल्यापासून त्यात नानाविध प्रकारे बैलांचा छळ होत होता. त्याचे प्रकार असे की, लाठीने मारणे, शेपूट पिरगाळणे ,चावणे, इलेक्ट्रीक करंट देणे, चटणी लावने मारणे, चाबूकहल्ला, मादक/उत्तेजीत पदार्थ पाजवणे इत्यादी. 
हे सर्व प्रकार निंदनीय तर आहेतच त्याहूनही क्रूरपणा यात भरला आहे. यास उत्तर देताना ते म्हणतात की हे जे असतंय ते शर्यतीपूरतं मर्यादीत असतं. 
परंतू हे उत्तर संयुक्तीक ठरत नाही. 
त्यानंतर गेल्या काही वर्षात कर्नाटकातील एकसंबा याठिकाणी विनाकाठी लाठी शर्यत्या घेतल्या जायच्या. त्या शर्यत्यांमध्ये देशातले अनेक स्पर्धक सहभागी सहभागी व्हायचे. प्रेक्षकांची गर्दी ध्यानात घेतली तर त्याठिकाणी लाखो प्रेक्षक जमायचे. अर्थात शर्यतप्रेमी कमी आहेत असेही नाही. हे यावरून स्पष्ट होते. त्याहून दूसरी गोष्ट ही महत्वाची दिसते की जो संवेदनशील मनुष्य आहे त्यास ही अशा विनाकाठीलाठी शर्यत्यावर आक्षेप असायचे काही कारण नसावे. ही शेवटी स्पर्धा खेळ आहे. यात मनोरंजन असते. 
आज या विषयाचा विचार करत असताना प्रकर्षाने हे जाणवते की ज्यात कुणावरही अन्याय होणार नसेल आणि त्यातून मनोरंजन जर होणार असेल तर त्यास कुणाचा विरोध असता कामा नये. पण काही 'अतिसंवेदनशील' प्राणीमित्रांच्या दृष्टीतून प्राण्यांवर अन्याय होत आहे. ते खरे आहे पण विनाकाठीलाठी या प्रकारात सुयोग्य नियोजन असेल तर काही अनुचित प्रकार रोखून 'निखळ' स्पर्धा घेण्यास ह्यांचा विरोध का असावा हे प्रश्न सुटत नाही. 
पाळीव प्राणी हे शेतकर्याला चांगले परिचीत हे प्राणीमित्र शेतकरी असतील याबाबत शंका आहे. 
जर विनाकाठीलाठी शर्यतीत बैलांवर अन्याय होत असेल तर याच न्यायीगणांनी ऊसवाहतूक करणार्या बैलांचे ओझे ऊचलावे. पंधरावीस किलोमीटर किंवा त्याहूनही अधिक अंतर टनांचे ओझे खांद्यावर वागवत बैल काय खुशीने जातो का ? चाबकाचे किती फटके पडतात ? याची कल्पना या प्राणीमित्रास अथवा बुद्धिमान न्यायीगणांना नसावी याचे भयंकर दुःख वाटते. या दोन गोष्टी जुळवून पाहिल्या की समोर काय येते ? 
मोठमोठ्या कारखानदाराना मालपूरवठा करण्यात बैल प्राण्यावर होणार्या अन्यायाकडे हे लोक दुर्लक्ष करतात पण शेतकर्याच्या विरंगुळ्यापायी त्यातही कोणतीही इजा न पोहचवता काही स्पर्धा घेता येतील तर त्यास परवानगी नाही. 
हा कुठला न्याय ? 
मुदलात प्राणीमित्रांची संवेदनशीलता कुत्र्यांची नसबंदी करताना कुठे जाते ? बैलाच्या मानेवर टनानी ओझे देवून चाबकाचे फटके देत ऊस वाहतूक करणार्या बैलांची कणव का येत नसावी ? 
चकचकीत जगात एसी गारव्यात रमल्यावर कर्तुत्वाची सर्टिफिकेट भिंतीवर लटकविण्यास आतुर असणारे कुठेही बेदम संवेदनशील होतात. समान न्याय देणार्या आंधळ्या न्यायदेवतेच्या पुजार्यांनी व्हीआयपी दर्शनाच्या पासची सुविधा चालु केली काय ? ही शंका उठते. 
एखाद्या विवादास्पद चित्रपटातले वाद असणारे तेवढेच दृष्य काढून टाकून प्रसारणाची परवानगी देते. तसेच या शर्यतीबद्दल काही नियम अटी लावून शर्यत्या सुरू करण्यास परवानगी द्यावी. 
नाहीतर दुर्दैवाने आम्हाला ज्या न्यायसंस्थेचा आदर आहे तिथे रिकामे बैल बसलेत असे म्हणावे लागेल.

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

नाहीतर 'शील' आपनाला आवडतं

सिंधूताई सपकाळ यांच्याविषयी काल दोन ओळी लिहल. आणि नंतर तिथं बरेच वाद झाले. त्याप्रसंगी सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे कर्तव्य आहे. सर्वप्रथम ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागतो आहे त्यांनी माफ करून टाकावं. 
आता आमचे म्हणने काय आहे ते थोडक्यात सांगावयाचे काम करतो. 
मला इतर देशांचं माहित नाही, भारतातल्या लोकांच एक असं आहे की त्याला बरेच आदर्श असतात. बहूतेकदा हे आदर्श छोट्या अनाथ लोकांसाठी काम केलेले. किंवा शुन्यातून आपलं विश्व ऊभारणारे. असं असतं. नंतर आपन त्या आदर्शास देवत्व बहाल करतो. त्याच्यानंतर आपन सर्वच ठिकाणी संबंधीत प्रेमामुळे आपन ती व्यक्ती ऐकत असतो. त्यात प्रेमामुळे आपली मत बनविन्यावर मर्यादा येतात असे मला प्रामाणिकतः वाटते.
त्यावेळी आपन त्या व्यक्तीचं सगळं कसं बरोबर हे पटवून घेतो आणि देतो.
हे सगळं नैसर्गिकता आहे. दोन लोक लढाया समोर करणारे दिसले की कुणा एकावर आपली मर्जी बसते आणि ती जिंकावी असं आपलं मन चिअर्स करत. हे स्वाभाविक आहे.
तसं होतं बरेचदा. यात आपन तटस्थबुद्धी हरपून जातो. आणि पुढं बोलणारी कुठल्याही मुद्दयावर भांडण असताना त्यावेळी बचावात्मक पवित्रा घेताना आपन हळव्या बाजूंची ढाल पूढे करतो.
आज एका उत्तुंग ठिकाणाला आपला देश आहे. मनुष्यबळ जादा आहे. ऊंची उडाण घेतो आहे. प्रगतीची नांदी आहे. असे असताना देशांतर्गत अडीअडचणी आहेत याकडे दूर्लक्ष करता कामा नये. या अडचणी कशातून उद्भल्या याचा शोध घेणे या प्रसंगी उचित वाटते. अडाणी पेक्षा अज्ञानी पणा जबाबदार आहे. अज्ञानी यासाठी की आजरोजी इथल्या शिकलेल्या लोकांस सूज्ञपणाची अक्कल नाही, तिथे संवेदना हरवून अप्पलपोटी स्वभावाची निर्मिती झाली आहे. यांस आजूबाजूची परिस्थिती जबाबदार आहे. त्यात स्वत्व टिकवून ठेवणे कुणास जमनार ? त्यासाठी तालावर नाचणे बंद करावे लागते. शोधावं लागतं स्वतःच काही. त्यास कष्ट म्हणटल जातं.
हे लक्षात घ्यायला खूप वेळ जावा लागतो. पण लक्षात आल्याच्यानंतर आपली मोठी अडचण ही की आतापर्यंतचं सगळं भंपक होतं ? हे लक्षात आलं की आपली आपनास लाज वाटते आणि इथून अधोगती ताबा घेते. जीर्ण उतरावयाला आपन तयार नाही आहोत ही मोठी अडचण आहे. इथ नैतिक कसोशी लागते, कमालीचा निगरगट्टपणा लागतो. किमान ऐकायची ताकद लागते. असे हे. त्यामुळे फारतर आपन त्याकडे दूर्लक्ष करण्यावाचून काही करू शकत नाही. आणि इथ फसतो आपन.
सिंधूताई सपकाळ यांना दोनदा ऐकायचा प्रसंग आला. त्यांचे कार्य अगाध आहे, त्याबद्दल शंकेला वाव नाही. त्यांचा प्रवास मोठा आहे. आक्षेप फक्त भाषनावर आहे. हे लक्षात घ्यावं. दूसर्या एक एॅड. अपर्णा रामतिर्थकर त्यांच सूद्धा कार्य मोठ्ठं. त्या वकिल आहेत.
वर्षानुवर्षे स्त्री घरात राहीली. ती आत्ता कुठे बाहेर येत आहे. समाजाच्या पटलावर कार्य करताना दिसत आहे. खोट्या नैतिकतेचा बूरखा फाडून क्षमता सिद्ध करू पहात आहे. त्याप्रसंगी मला या दोन समाजसेविकांच्या वकत्व्यावर आक्षेप घ्यावा वाटतो. आपल्यापैकी किती लोकांनी त्यांना ऐकले ठाऊक नाही. सतत जाणवतं कि कुठेतर यांचं चुकत. बर शहराच ठिक आहे. खेड्यातल्या स्त्री वर्गास त्या पटून जातात मग तिथं काय करणार ? खरं काय ? खोटं काय ? हे ग्रामिण स्त्रीला कोण सांगणार ?
व्यकतीस्वातंत्र्य प्रत्येकास आहे. म्हणून आपन काय बोलावे काय नको. याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. ते तसे होताना दिसत नाही. याचे वाईट वाटते. समाजमनाने एकदा इकडंही पाहिलं पाहीजे. नाहीतर 'शील' आपनाला आवडतं. तसं 'विकसनशील' ही उशीरा आवडत राहील. smile emoticon

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

भगवान ऋषभदेव प्रतिष्ठापणा

गेले काही दिवस नाशिक जिल्ह्यातील मांगीतूंगी येथे भगवान ऋषभदेव यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा चालू आहे. 
मुर्ती भव्य म्हणजे एकशे आठ फूट ऊंचीची आहे. एकोणीस वर्षापासून त्यावर काम चालू आहे. गिनीज बुकवाले याची नोंद घेणार असल्याचे ऐकिवात आहे. 
जैन धर्म जूना. या धर्माने अहिंसा , अनेकांतवाद, भूतदया असे अनेक तत्वज्ञान दिले आहेत. आजही जागोजागी देशोदेशी अहिंसेचे पूजारी हारखून जावून गांधी मंडेला ई लोकांच्या पूतळ्यांचे, संग्रहालयाचे उदघाटन नुतनीकरण जोरात चालू आहे. कुणाला हिंसा पाहीजे आहे?
कालपरत्वे घडलेल्या बदलात जैन समाज वाहत गेला आणि आजतारखेला धर्मतत्वज्ञानाचा अभ्यास करताना संदर्भ ताडून पाहिले तर तत्वज्ञानाचा आणि आपला काडीमात्र संबंध नाही अशा पातळीपर्यंत अधोगती झालेली प्रकर्षाने जाणवते. फक्त श्रीमंतीचे सोहळे इथे साजरे व्हावयास सुरवात झाली. यापलिकडे आज तिथे काहीही नाही. मुर्तीपूजा मुळात नव्हतीच. आज ती परिस्थिती नाही. जिकडे जाल तिथे फटफटीत मूर्त्या आणि बसत्या. बरं ते राहिले तर त्या मुर्तींच्या पूजेचा मान खिशात लाखोकरोडो रूपये असणार्यास. अलिकडचे कडवे प्रवचन देणारे राष्ट्रसंतही (?) त्यातलेच ! पंचवीस हजाराचे मानधन देणार्यांकडेच हे भोजन करायचे. अजूनही तेच करतात.
सांगायचा मुद्दा असा कि , गेल्यावर्षातल्या तीन घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत. एका गृहस्थास तो मांसाहार करतो म्हणून या लोकांनी त्यांचेवर हल्ला केला. दूसरी घटना अशी की पर्युषन पर्व काळात मांसाहारी दूकाने बंद ठेवावी असा फतवा. तिसरी घटना अशी राजस्थान न्यायालयाने संथारा (सल्लेखना) वर बंदी घालण्याचा काढलेला आदेश. आणि त्याविरूद्ध सर्व राज्यात केलेले आंदोलन.
ह्या तीनही घटना निराळ्या असल्या तरी त्यात कुठेतर एकसूत्रता जाणवते. ज्यावेळी मांसाहार करणार्या गृहस्थावर हल्ला होतो. त्यावेळी अहिंसा कुठे जाते ? इथे लोकशाही आहे. कुणी काय खावे, ल्यावे, प्यावे संचारावे यावर कुणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यातही यांचा युक्तीवाद असा की परस्परांच्या भावनेचा आदर करावा. हे जर असे तर राज्यात आज काय परिस्थिती चालु आहे ? भयंकर दूष्काळाच्या सावटाखाली राज्य आहे. अशा परिस्थितीत आपले करंटे राज्यसरकार तरी शहाणे असावे. ते ही नाही. उलट या लोकांनी इथे कोट्यावधी रूपयांचा निधी देण्याचे पराक्रम केलेच आणि तिकडे चाराछावण्या बंद पाडायचे. त्यानुसार ते चालू आहे. इथे संवेदनशीलता कुठे जाये ?
तिसरी घटना अशी की सल्लेखना म्हणजेच जिवंत समाधी ! ह्या गोष्टीचा आज काय उपयोग होतोय ? हे ऐकाल तर थक्क व्हाल. एखादा वृद्ध व्यक्ती आजारी पडला की त्यास हे व्रत देवून विनाजेवण पाणी अखंड जप करत त्यास समाधी दिली जाते. गेल्याच वर्षी अरूणा शानबाग गेलो. तिला इच्छामरण मिळाले नाही. भयंकर वेदनाग्रस्त जीवन ती जगली. न्यायपालिकेने मात्र इच्छामरणाच्या याचिका फेटेळल्या. इथे राजस्थान उच्च न्यायालयाने सल्लेखना वर बंदी आणायचे आदेश काढले आणि त्याविरूद्ध आंदोलन झाल्यावर ते बारगळले.
जिथं माणसाचं क्षणाक्षणाचे विचार बदलत असतात तिथे एखाद्यास असे व्रत देणे हे हत्या करण्याजोगेच !
लाखोकरोडांच्या बोलीतून पूजेचे मानकरी सवाल विकून, लाखो लिटर पाणी फळांचा रस यांचा अपव्यव करून कोणत्या दिशेने समाज वाटचाल करतोय ? अहिंसा इतकी बोथट झालेली आहे का ?याचा विचार करणे या समयी क्रमप्राप्त ठरत आहे.
सोईस्कर पंथी तत्वज्ञान मांडून श्रीमंतीचे आचरट सोहळे करणार्यास त्यांचा मोक्ष मुबारक !


श्रेणिक नरदे
17 hrs

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

सचिन आणि भारत देश .....


सचिन तेंडूलकर हा क्रिकेटचा बादशहा. पहिली मॅच झिरो वर बाद होऊन हा मोठ्ठा झाला. ते आजपर्यंत ह्याच्या नावाच्या अनेक कथा. संयमी खेळाडू ते क्रिकेटचा देव ई. आम्हाला हे त्याचे महानपण मान्य आहे. क्रिकेट हा मूळचा आपला खेळ नाही हेही मान्य. परकीय आहे, किंवा इंग्रजाचा वगैरे अशा अनेक समजूती आपन करून घेतलेल्या. घेतलेल्या या इतक्यासाठी की आज गल्ली ते दिल्ली हा खेळ इतका लोकप्रिय आहे की त्याची सुरस कवणे ऐकून आमचे कान धन्य झाले आहेत. अशा प्रसंगी एकशेपंचवीस कोटी लोकसंख्येत तसे तेहतीस कोटी आणि त्यावर जिवंत देव म्हणून एक सचिन तेंडूलकर. म्हातारे कोतारे ते पहीली दूसरीचे बालक वर्ग त्यांचा चाहता. त्यात गैर काही नाही.
हेच माननीय भारतरत्न सचिन तेंडूलकर जेव्हा भारतीय संसदेचे सदस्य झाले. राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हां संपूर्ण भारतवर्ष हे त्यांच्याकडे डोळे लावून देव काय करेल ?
असा विचार करत होते. तेव्हां ह्या भक्त लोकांच्या पदरात काय पडले ? ह्याचा विचार बरेचदा आम्हाला छळत असतो. साहित्यिक, खेळाडू, विचारवंत, संशोधक यांसाठी राज्यसभेच्या काही राखीव जागा असतात. तर हे जिथून आले त्या क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडविण्यास मदत म्हणून आपले सरकार या लोकांकडे अनुभवजन्य मदत मागत असते. मागत असते अर्थी त्या लोकांनी तिथल्या समस्या बदल्यात काही उपाय सूचवावेत ही किरकोळ गोष्ट. त्यात हे भारतरत्न म्हणजे दांडगे अनुभवी. चार कर्णधार बदलले पण हे संघात राहीले, त्या अर्थी अनुभव दांडगा. प्रमूखापेक्षा कार्यकर्त्यासच अडचणी दांडग्या. त्याप्रसंगी बरेच चेंडूफळीवाले तरी मनात आशा धरून होते. हा देव काही चमत्कार करेल आणि आमचे कौशल्य कुठेतरी देशासाठी फळाला येईल. ही भाबड्या चंडूफळीवाल्यांची अपेक्षा. ते झालेच नाही.
हे सचिन तेंडूलकरही तेच जे काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सौभाग्यवतीनी जिथून चमत्काराने सोनसाखळी पैदा केली, तसेच एक जादूगार सत्यसाईबाबा यांचे शिष्य होते. तिथून त्यांनी आंगठी पैदा केली होती. असो.
भारतीय विधानभवन म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा हे वरिष्ठ. बाकी लोकसभा ही द्वितीय. जनतेने निवडलेले लोक लोकसभेत असतात. तर राज्यसभेत बुद्धीमान लोक असतात. उदा स्मृती इराणी, अरूण जेटली ई.
तिथे ह्या सचिन तेंडूलकराना काँग्रेस पक्षाने खासदारकीची वस्त्रे चढवून वाजत गाजत राज्यसभेत पेश केले. तसे ह्या काँग्रेसवाल्याना किंवा भाजपवाल्यांना अशातही विक्रम करायची चक्रम सवय असते हे मान्य. पण स्वतःचे जगभर चाहते असणारे लोक ज्यावेळी अशा सभागृहात जातात त्यावेळेस त्या लोकांस एक संधी चालून आलेली असते. त्याचा वापर करणारा एकही हिरा आजतागायत सापडावा तर त्यास सोन्यात मढवले असते. पण इथे सगळे काळे कोळसेच.
आता इथे चर्चेत कुणीतरी मुद्दा काढेल की, सचिनने इथे इतके पैसे दिले, अबक हे गाव सुधारले. तिथे पायाभूत सोईसुविधा वगैरे कशा पुरविल्या याच्या कान विटेस्तोवर कहाण्या सुनावल्या जातील. हे नवे नाही. पण ज्या कामासाठी आपनास या सभागृहाची पदे बहाल केली त्याचं आपन काय केलात ? या प्रश्नाचं जर प्रामाणिक उत्तर शोधलं तर हाती काय मिळतं ?
सचिन हे प्रातिनिधिक इतरांचे काय ?
इथून जनतेतून निवडूण गेलेल्यांचे दिवे तर कुठं उजळत आहेत ?
हे एकदा गंभीररित्या या भारतवासियांनी पाहीले पाहीजे.
तसेच हिमंती खेळाडूनी देखील आपल्या नाकर्तेपणाची नोंद घेवून पंचानी निर्णय देण्याअगोदर बाहेर झालं तर बरे होणार नाही का ?
झालंय कसं माहितंय. 1991 ते 2008 पर्यंत मोठ्या प्रमाणात गर्भपात (स्त्रीभ्रुणहत्या) झालेत. त्यामुळे या काळात सरासरी 130 दरहजारी कमी मुली आहेत. किंवा त्यापेक्षा कमी. आत्ता ती पिढी लग्नवयाला आलीये. आणि साहजिकच मुली कमी असल्याने कर्नाटकात स्थळ बघायला चाललेत. आंतरजातीय लग्न व्हायलेत. कोण कूणाला इतकं काही बोलेनात, किंवा आंतरजातीय लग्नाला फारसा विरोध होत नाही. हूंडा वगैरे लांबचं. लोक शहाणे झालेत.
इथं जगताना......
भारत देश विवीध समूहांच्या धर्माजातीनी बनलेला देश आहे. त्यात बहूसंख्याक, अल्पसंख्याक ही वर्गवारी. त्याच्यानंतर एकाच धर्माच्या अनेक पोटजाती. त्यांच्या विवीध चालीरीतीरूढी. 
धर्म ही पूरातन संकल्पना आहे. तिचा शोध लावणारा त्या काळात भल्यासाठीच लावला असेल. कुठेतरी एकोपा नांदेल या दृष्टीकोनातून. जून्या गोष्टी गेल्या किंवा जात राहिल्या. परंतु धर्मजात ही गोष्ट काही केल्या गेली नाही. तिचं उद्दातीकरण, किंवा नवनव्या संकल्पना येत राहिल्या. ज्या धर्मात मुर्तिपुजा वर्ज्य होती, त्याही मुर्तीपूजेकडे धर्म टिकविण्याच्या भावनेने वळल्या. अर्थात आपल्याला धर्माच्या तत्वज्ञानाशी काही देणघेणं नसतं. त्याच मुळ अज्ञानात आहे. देव सूरवातीला झाले. (म्हणजे ते असतील वा नसतील.) 
त्याचं नवं रूप जे आपल्याकडं आलं ते भयंकर आणि तितकच भंपक. हाडामांसाच्या माणसानी ज्यांनी इथं घरावर तुळशीपत्र ठेवून समस्त जनकल्याणार्थ कार्य केलं. ती व्यक्ती सर्वांसाठी कार्य करते आहे हे विसरून त्याला आपल्या धर्मात अथवा जातीत बंदिस्त केल्यानं त्या महापूरषाबद्दल मर्यादा आणण्याचं पद्धतशीर काम झालं. एका जातीधर्माइतकीच त्याची मर्यादा झाली. त्यातून त्याच्या इतर पैलूंचे आकलन होण्यास मर्यादा आल्या हे मान्य करावे लागते. 
आज प्रगतिच्या वा विकासाच्या वाटेवरून जग आगेकूच करत असताना आपल्या धार्मिक भावनाही तितक्याच प्रखर बनत चालल्या आहेत. यात कुणीच मागे नाही. माणसांनी इथं जी आधूनिक क्रांति केली ती इंटरनेट, इलेक्ट्रानिक माध्यम यावरूनही देवाधिकांचा प्रसार चालु असतो अविरतपणे. यास मुर्खपणा म्हणायचा की आणखी काय ? असे बरेच प्रश्न येताहेत. 
ज्यासमयी या राष्ट्रात राजेशाही होती तेव्हां इथे धर्माधिष्ठीता गैरलागू होती, कलागुण, बुद्धिवंत असणारा माणूस त्याची हूशारी दाखवून राजाच्या दरबारातली मानाची पदं मिळवत होता. त्यावेळेस जात्यंधता नव्हती, जे जे कल्याणकारी असेल ते ते राज्य पुढे जाण्यास उपयोगात आणले जायचे. त्यावेळेस कुठला भेद आणि कुठला सेक्युल्यारिझम ? 
असं काहीही नव्हतं. परंतू नंतरच्या काळात आपापल्या सोईने जसे होईल तसे त्या ईतिहासकाराने मांडावयाचे चाळे केले. त्यात आम्हा भारतीयाना एक नायक आणि एक खलनायक राम रावणापासून सिंघम जयंकांत शिकरे पर्यंत लागतो. मनोरंजनाचे ठिक. परंतू ईतिहासात जो अतिरंजितपणा आलेला आहे त्याने ईतिहासाकडे बघण्याची तटस्थवृती आपन हरवून बसलेलो आहेत. या रंजनाच्या मोहापायीच ईतिहासामुळे उन्मादित उद्दामपणा पावलोपावली ठसला गेलाय. वरतून त्या नायकांना जातीधर्माच्या तबेल्यात डांबलं गेलं. त्या धर्मजातीचा तो त्याचा अनुयायी असे होत गेले. परधर्मजातीचा तो शत्रु हे कुठतरी बिंबवल किंवा बिंबल गेलं. यातूनच आजपर्यंत बरेच संघर्ष उदभवले आणि उदभवताहेत. 
................................................
शेवट :
आजघडीला या देशातून, जगातून देवधर्म हद्दपार करणे. ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही. आपला मेंदू विकसित झालाय. तटस्थपणे, कोणताही अंह मनात न आणता एखाद्या गोष्टीकडे बघण्याची सवय लागली पाहीजे. यातूनच जिज्ञासूवृत्ती वाढते. जाणिवा समृद्ध होतात. कुठल्याच मर्यादा न पाळता केलेलं काम हे समाधान देणारं आहे. जग जवळ आलंय. कित्येक नव्या गोष्टीचे आदानप्रदान होऊ शकते. जे आपल्याला समृद्धीकडे नेत असते. आपलं कुठं चूकतंय किंवा दूसर्याच बघून आपणास काय सूधारणा करता येवू शकतात ह्या आता बघणे आपल्या हातात आहे. द्वेषबूद्धीने मेंदू मंद पडतो. जरी देवधर्म हद्दपार होणार नसतील तरी आपन एकमेकाच्या भावनांचा आदर करण्याइतके निश्चित प्रगल्भ झालोय. ह्या अशाच मार्गाने गेलो तर एकदिवस देवधर्म ही शेपटी सारखे गळून पडतील. बदल घडवला पाहीजे.
राज्यात जेव्हां राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होते तेव्हा जलसंपदा विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. सत्तेत असताना, सुनिल तटकरे, अजित पवार यांच्याकडे हे पद होते, आणि शेवटीशेवटी हसन मुश्रीफ यांच्याकडे हे पद होते.
या सरकारच्या काळात अनेक मोठे सिंचन प्रकल्प झाले. होत होते.
'आदर्श' घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेवर आरोप झालेनंतर त्यांचा राजीनामा घेवून काँग्रेस पक्षाने दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात काम पाहणारे पृथ्वीराज चव्हाण यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले. दरम्यान राज्यात जिल्हापरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुका लागल्या. चव्हाण नवे होते. या निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत मते मिळवत पहीला क्रमांक घेतला आणि पृथ्वीराज चव्हाण अस्वस्थ झाले. मुद्दामहून कामाच्या फायली रोखून धरण्याचा सपाटा लावला. तो इतका की खुद्द शरद पवारांनाही चव्हाणांच्या हाताला लकवा भरलाय की काय ? असं वक्तव्य करावयास भाग पाडलं.
तिथून राष्ट्रवादी विरूद्ध इतर सगळे पक्ष असं समिकरणच राज्यात तयार झालं. याच पृथ्वीराज चव्हाणानी सिंचनावर एवढा खर्च होवूनही फक्त एक टक्के च सिंचन झालं असा आरोप केला. त्याच्याच नंतर विद्यमान मंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, किरीट सोमय्या, विनोद तावडे, रावसाहेब दानवे. शिवसेनेचे रावते व अभियंता विजय पांढरे (हे तेच आम आदमी पार्टीचे ! ) इ लोकांनी सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटी रूपयांचा झाला असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीवर लावला. त्यानंतर राज्यभर याच चर्चेला औत आला. त्यावेळी ऐन दूष्काळ होता. त्याप्रसंगी चाराछावनी टँकरने पाणीपूरवठा ईत्यादी उपक्रम हाती घेतले गेलेते आणि ते सूरळीत चालू होते परंतू इथे अजित पवारांना विरोधी पक्षानी आणि माध्यमांनी गप्प बस दिलं नाही. त्या त्रासाला आणि आरोपाला उत्तर म्हणून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपदाचा राजिनामा मुख्यमंत्र्याकडे सोपवला आणि ते सत्तेतून बाहेर पडले. याच्याचनंतर जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढण्याच काम अधिकार्यांमार्फत चालु झालं. त्या काळात अजित पवारांवर मोठ्ठा दबाव होता. अकोले तालूक्यातील पिचड यांच्या मतदारसंघात निळवंडे कालव्याच भूमिपूजनही केलं. त्याप्रसंगी केंद्रात काँग्रेसवर कोळसा खाण घोटाळा, टू जी स्कॅम, इत्यादी वर आरोप होवून अक्षरशा मनमोहन सरकार हैराण होतं. त्यातच इकडे महाराष्ट्रात हा घोटाळा झाल्याच्या बातमीनं देशातील वारे फिरले. केंद्रसरकार, मुख्यमंत्री, विरोधीपक्ष, माध्यमं ह्यानी फक्त अजित पवाराना टार्गेट केलं. दोन महिन्यानी श्वेतपत्रिका आली. ती वाचायची तसदीही न घेता त्यावेळी दूष्काळाचं राजकारण भाजप शिवसेने मनसेने केलं. परिणामी राष्ट्रवादीला लोकसभेत मोठ्ठा धक्का बसला. काँग्रेसलाही पाप फेडावं लागलं. काँग्रेसही भूईसपाट झाली राज्यात. भाजपच सरकार बहूमतानं केंद्रात आलं. लगेच विधानसभा लागली. चारही पक्ष स्वबळावर लढले. मोदी लाटेचा प्रभाव अजून होता. त्यात काँग्रेस राष्ट्रवादी परत नेस्तनाबूत झाली. सत्तेच्या काठावर भाजप येवून ठेपला. बर्याच अंकानंतर शिवसेनेशी यूती झाली.
सत्तेवर आल्यावरही फडणवीसानी राजकारण तसंच सूरू ठेवलं. जलयुक्त शिवार ही संकल्पना आणली. यातून काय तर फक्त शेततळे होईल. आणि पावसाचे पाणी साचून राहील ही व्यवस्था. या पल्याड याचे काही फारसे नावाजण्याजोगे काम नव्हते. भाजपची यंत्रणा ही प्रचारकी आहे हे इथे नमूद करावे वाटते. पावसाळ्यात ते फोटो पाहीले की वाटायचे की काय अचाट प्रगति केलीय या सरकारने ! हे सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून हाच समज होतो. एकीकडे कितीतर कोटी रूपये खर्चून थोडंच पाणी आणि इथं मात्र अल्प खर्चात पाणीच पाणी ! असा एक दृष्टीकोन तयार होण्यात या प्रचारकी भाजप पक्षाने यश साधले. मात्र आज त्या जलयुक्त शिवारच्या खड्ड्यात जनावरांस तरी पाणी आहे का ? नाही. फक्त राजकारण केलं गेलं जलयुक्त शिवार योजनेचं. यातून आधीच्या लोकांविरूद्ध जनतेची मतं बनविन्यात भाजपला यश आलं.
पावसाळ्याचे महिने गेले. अजून तसा हिवाळाच. गेले दोन महिने मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. विदर्भ मराठवाड्यातला ऊसाचा गळीत हंगामही संपला. पश्चिम महाराष्ट्रात थोडी परिस्थिती बरी मातूर पावसाचे प्रमाण कमीच. धरणात जलसाठा कमी आहे. अशा प्रसंगी गेले काही दिवस चालु असलेल्या चाराछावण्या बंद करण्याचा पराक्रम जिल्हाधिकार्याने केलाय. हे जिल्हाधिकारी आदेशाचे पाबंदी. त्यांनी बंद केलं. याना आदेश देणारे या दूष्काळाचही राजकारण करून चाराछावण्या बंद करून आधीच्या सरकारचा नाकर्तेपणा दाखवायाच्या प्रयत्नात आहेत. जनावरांची या सरकारास अफाट माया आहे. मागेच आपन पाहिलंय गोहत्याबंदी. या काळात निदान गौमातेचा तरी सरकारने विचार करावयास हवा होता. हायकोर्टास गोमातेची दया आली त्यांनी विचारलंय 'चाराछावण्या बंद का ?'
तिथून आता हे वठणीवर येणार. या प्रसंगी सरकारातले सहभागी महाभाग शेतकर्यांचे नेते गुळगट्टम मंत्रीपदाचा आंबा पाडण्यात व्यग्न असून ते शेतकर्याची बाजू घेवून सरकारच्या राजकारणात विघ्न तुर्तास आणू इच्छित नाहीत हे दिसते.
ही बारी गेली जूमलाजुलमीत निदान पुढच्या बारी तर बांधावरल्यानी कुठं टाॅनिक द्यायच आणि कुठं तणनाशक मारायचं एवढं लक्षात ठेवलं तरी बरं होईल.